शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

चोरट्यांनी सहा महिन्यांत पळविल्या ४६३ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:27 AM

जानेवारीपासून आतापर्यंत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून ४६२ दुचाकी पळविल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन वर्षांपासून सुसाट वाहन चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारीपासून आतापर्यंत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून ४६२ दुचाकी पळविल्या. विशेष म्हणजे २०१५ आणि २०१६ यावर्षीही सहा महिन्यांत वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण समान आहे.गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांच्या दुचाकी चोरटे पळवीत आहेत. दुचाकी चोरट्यांचा भरदिवसा सुरू असलेला हा धुमाकूळ रोखण्यात पोलीस यंत्रणेला म्हणावे तसे यश येत नाही. परिणामी घरासमोर असो अथवा कार्यालय, रुग्णालयाच्या पार्किं गमध्ये लॉक करून ठेवलेल्या दुचाकी चोरटे बिनधास्तपणे पळवितात. यावर उपाय म्हणून काही वाहनमालक दुचाकींना साखळदंड बांधतात. शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा फारसा परिणाम चोरट्यांवर झालेला दिसत नाही. २०१५ मध्ये चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ९०० दुचाकी पळविल्या होत्या, तर गतवर्षी २०१६ साली दुचाकी चोरीचा आकडा ९१८ पर्यंत वाढला होता. या दोन्ही वर्षी अनुक्रमे २०९ आणि २६८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. यावर्षी जानेवारीपासून ते जुलैअखेरपर्यंत चोरट्यांनी ४६२ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या, तर आतापर्यंत केवळ ५८ गुन्हेच उडघकीस आणण्यात पोलिसांना यश आले. वाहनचोरी रोखण्यासाठी गस्त प्रभावी अस्त्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावून गस्तीवरील वाहनांची गती वाढविली. आयुक्तांनी शहरातील प्रत्येक कोपरा आणि प्रमुख रस्ते सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आणण्याचे ठरविले.