शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

दोन महिन्यांमध्ये ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: August 26, 2015 11:44 PM

बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. चालू वर्षात एकूण १७६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. मागील चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. यातच जवळील चाराही संपल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये जुलै महिन्यात २५ तर आॅगस्टमध्ये २३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.यंदा शेतकऱ्याने उसनवारी करून खरीप हंगामातील पेरणी केली. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने डोळ्यादेखत पिके जळून खाक झाली. उसनवारी कशी परत करायची ? या काळजीने शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबत आहेत. आता तर चारा टंचाईनेही कहर केला आहे. चारा छावण्या सुरू होतील म्हणता म्हणता आॅगस्ट महिनाही संपला आहे. (प्रतिनिधी)