शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश

By मुजीब देवणीकर | Published: July 22, 2022 8:03 PM

आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे.

औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर मनपाकडून चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. खत निर्मितीचे हे प्रकल्प ३ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. या कचऱ्यातून खतापेक्षा जास्त ६ हजार ५५ टन एवढे ड्रायवेस्टच निघाले.

शहरात २०१६ मध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शंभर टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. मनपाच्या १४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी अशा चार ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल वगळता इतर तीन प्रकल्प सुरू झाले आहेत. चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पांची क्षमता दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. तीन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला तर दोन वर्षांपूर्वी पडेगावचा प्रकल्प सुरू झाला. या दोन्ही प्रकल्पात आत्तापर्यंत खासगी एजन्सीने ५ हजार १९० टन खताची निर्मिती केली असल्याचे घन कचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. तयार केलेले खत दीड हजार रुपये टन या दराने खासगी कंपन्यांना विकले जात आहे. कचऱ्यातून खतापेक्षा ड्रायवेस्टच जास्त निघाल्याचे समोर आले आहे. ८ हजार ५५ टन ड्रायवेस्ट आतापर्यंत अंबुजा सिमेंट, सोशल लॅबला देण्यात आले आहे.

हॉटेल वेस्ट मिळेनाकांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची दररोज २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पण महापालिकेला फक्त साडेचार टन ओला कचरा मिळत आहे. अनेक हॉटेल चालक महापालिकेला शिळे उरलेले अन्न देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हॉटेल वेस्ट जमा करण्यासाठी घन कचरा विभागाने स्वतंत्र घंटागाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घंटागाड्यात ओला कचरा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न