शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

By विकास राऊत | Published: December 27, 2023 3:13 PM

बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सरत्या वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे ७६ पैकी ३८ शहरांवर फेब्रुवारी-मार्च २०२४ नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होणार आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

जून २०२४ पर्यंत १९ शहरांना तर ८ शहरांना जुलै २०२४ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. ६ शहरांना एप्रिल-मे अखेरपर्यंत, १२ शहरांना मार्च अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होऊ शकेल. फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ शहरांना पाणी देता येणार आहे. तर ४ शहरांना जानेवारीअखेरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. दोन शहरांचे स्त्रोत आटले आहेत. ६ शहरांना येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होईल.

१ कोटी लोकांची तहान कशी भागणार?२०११च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. परंतु सध्या लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे, शक्य असून सुमारे १ कोटीहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या उन्हाळ्यात भेडसावेल.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय शहरे.......किती दिवस पाणी पुरणारछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर.........वर्षभर पुरेलवैजापूर..........जानेवारी २०२४सिल्लोड------जून २०२४पैठण---------जून २०२४कन्नड--------जानेवारी २०२४गंगापूर..............फेब्रुवारी २०२४खुलताबाद..........मार्च २०२४फुलंब्री..............फेब्रुवारी २०२४सोयंगाव..............एप्रिल २०२४

जालना जिल्हाजालना शहर..........सध्या पाणीसाठा आहेअंबड.................एप्रिल २०२४परतूर................ मार्च २०२४भोकरदन...........जलस्त्रोतांमध्ये पाणी नाहीबदनापूर.............मार्च २०२४घनसावंगी..........फेब्रुवारी २०२४जाफ्राबाद............फेब्रुवारी २०२४मंठा.................फेब्रुवारी २०२४तीर्थपुरी............मार्च २०२४

परभणी जिल्हा...................मानवत.........मार्च २०२४पाथरी.............फेब्रुवारी २०२४सेलू..............फेब्रुवारी २०२४पालम............फेब्रुवारी २०२४पूर्णा..................फेब्रुवारी २०२४सोनपेठ...........फेब्रुवारी २०२४जिंतूर.................फेब्रुवारी २०२४गंगाखेड..............फेब्रुवारी २०२४

हिंगोली जिल्हा...............हिंगोली..............जुलै २०२४वसमत.............जुलै २०२४कळमनुरी............जुन २०२४औंढा नागनाथ...........जुन २०२४सेनगाव...............जुन २०२४

नांदेड जिल्हा..................कंधार...................जुलै २०२४कुंडलवाडी............जुलै २०२४किनवट.............जुलै २०२४देगलूर...............नोव्हेंबर २०२४धर्माबाद..............जुलै २०२४बिलोली..................मे २०२४लोहा..............फेब्रुवारी २०२४उमरी...............मार्च २०२४हदगाव.............पाण्याचा स्त्रोत नाहीभोकर...........जून २०२४मुखेड................जून २०२४मुदखेड............नोव्हेंबर २०२४अर्धापूर.........जून २०२४माहूर.................मार्च २०२४हिमायतबाग.........जून २०२४नायगाव...............जून २०२४

बीड जिल्हा............................बीड..................फेब्रुवारी २०२४अंबाजोगाई...........जून २०२४परळी...................जून २०२४गेवराई...................जून २०२४माजलगाव...............फेब्रुवारी २०२४धारूर.................जुलै २०२४केज................जुलै २०२४आष्टी.............जुलै २०२४पाटोदा...............एप्रिल २०२४शिरूरकासार............जानेवारी २०२४वडवणी..............मे २०२४

लातूर जिल्हा........................उदगीर.......................जून २०२४अहमदपूर..................जून २०२४निलंगा.......................जून २०२४औसा....................जून २०२४चाकूर....................जून २०२४शिरूरअनंतपाळ..........मार्च २०२४देवणी.......................मार्च २०२४जळकोट................मार्च २०२४रेणापूर................मार्च २०२४

धाराशिव जिल्हा.............धाराशिव................मे २०२४तुळजापूर.................जून २०२४नळदुर्ग..................जून २०२४उमरगा................जून २०२४मुरूम..................फेब्रुवारी २०२४कळंब................मार्च २०२४भूम..................जानेवारी २०२४परंडा.................फेब्रुवारी २०२४वाशी....................फेब्रुवारी २०२४लोहारा..............फेब्रुवारी २०२४

सरते वर्ष कमी पावसाचेमराठवाड्यात यंदा १५ टक्के कमी पाऊस झाला. नांदेड, हिंगोली वगळता कुठेही समाधानकारक पाऊस नाही. अवकाळी पावसाने डिसेंबरमध्ये हजेरी लावली. त्याचा फारसा परिणाम जलसाठा होण्यावर झाला नाही. मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शहर, गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

योजनांवर निर्णयच होत नाही...मराठवाडा वॉटरग्रीडवर निर्णय होत नाही. सरकार चर्चेला वेळ देत नाही. नवीन योजनांचा विचार नाही. कमी पाऊस पडल्याने ३७ टक्केच जलसाठा प्रकल्पांमध्ये आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात शहरांसह ग्रामीण भागात पाणीटंचाई भीषण असणार आहे.-डॉ.शंकर नागरे, माजी सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी