शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

अणुजीव तपासणीत २ महिन्यांत ५०४ नमुने आढळले दूषित

By admin | Published: December 09, 2015 11:32 PM

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात गत दोन महिन्यांत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने केलेल्या अणुजीव पाणी तपासणीत तब्बल ५०४ नमुने दूषित आढळून आले आहेत.

गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यात गत दोन महिन्यांत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने केलेल्या अणुजीव पाणी तपासणीत तब्बल ५०४ नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरी, कूपनलिका तसेच गावांना पाणीपुरवठा करणारे इतर जलस्त्रोतांमधील पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा प्रयोग शाळेत करण्यात येते. गत काही महिन्यांत दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तपासणीवरून स्पष्ट होते. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा आढावा घेतल्यास दोन महिन्यात अनुक्रमे ३१७ व १८७ पाणी नमुने दूषित आढळून आले. यात कोलीफॉर्म जंतूचे प्रमाण आढळून येते. दूषित पाण्यामुळे साथरोग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा प्रयोग शाळेतील अणुजीव व रासायनिक दोन प्रक्रियेद्वारा पाणी तपासणी होते. यात अुणजीव तपासणीत दूषित पाणी आढळून आले. ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर केल्यानंतर तसेच पुन्हा तपासणी केल्यानंतर पाणी वापरावे, असे आवाहन प्रयोगशाळेच्या वतीने करण्यात येते. सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या भागात अस्वच्छता तसेच ब्लिचिंंग पावडर न वापरल्याने जलसाठे दूषित होतात.आॅक्टोबर महिन्यात बदनापूर तालुक्यातील १३१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात दोन नमुने दूषित आढळले. भोकरदन १७५ पैकी ५६, घनसावंगी ९६ पैकी ६०, जाफराबाद ५५ पैकी २४, जालना २३४ पैकी १२७,मंठा २२पैकी ६, परतूर ७८ पैकी ४२ नमुने दूषित आढळून आले आहेत. ४जालना नगर पालिका हद्दीतील चार नमुने दूषित आढळून आले. एकूणच अणुजीव तपासणीत दूषित पाण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. याविषयी प्रयोग शाळेच्या तंत्रज्ञ ठोंबरे म्हणाल्या, पाणी तपासणीचे नमुने देतानाच संबंधितांना ब्लिचिंग पावडरसह अन्य औषधींचा वापर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जाते.नोव्हेंबर महिन्यात बदनापूर तालुक्यात १३६ पैकी १ नमुने दूषित आढळून आला. भोकरदन १७५ पैकी ३३, घनसावंगी ७९ पैकी २७, जाफराबाद २८ पैकी ४, जालना २१५पैकी ७४, मंठा २० पैकी ८ तर परतूर ८९ पैकी ४० नमुने दूषित आढळून आले.