शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
5
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
6
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
7
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
8
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
9
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
10
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
11
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
12
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
13
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
14
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
15
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
16
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
17
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
18
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
19
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
20
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती

By मुजीब देवणीकर | Published: November 02, 2023 4:00 PM

शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या २०५० मध्ये किती राहील, हे गृहीत धरून २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक अडथळ्यांनंतर योजनेच्या विविध कामांनी आता चांगलीच गती घेतली आहे. आतापर्यंत योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. याच गतीने काम सुरू राहिल्यास डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत वारंवार याेजनेचा आढावा घेत आहेत. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारण्यासाठी कॉफरडॅम उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम सुरू होईल. धरणाच्या पायथ्याशी खडक लागल्याने ब्रेकरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले. या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी नसल्याने खडक फोडण्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. दररोज दोन ते तीन जलवाहिन्यांना वेल्डिंग केली जात होती. आता हे प्रमाण तब्बल ७ पर्यंत नेण्यात आले. त्यामुळे २२ किमीपेक्षा अधिक अंतरावर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. पुढील ८ किमीसाठी पाइपही आणून ठेवण्यात आले. काही ठिकाणी मनपाच्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येतोय. किंचितही धक्का लागला तर दोन्ही वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने अत्यंत सावधगिरीने काम करावे लागत असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोगलोतू यांनी सांगितले.

शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्याशहरामध्ये १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकायच्या आहेत. त्यालाही गती दिली असून, दररोज दोन ते अडीच किमी. जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. नक्षत्रवाडी येथे सहा जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यांतील तीन पूर्ण झाली असून, उर्वरित केंद्रांचे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले.

मनपाचे जलकुंभाकडे लक्षनवीन पाणीपुरवठा योजनेत तयार करण्यात आलेले जलकुंभ हस्तांतरण करून घेणे, त्याचा त्वरित वापर सुरू करण्यावर मनपा प्रशासनाने भर दिला आहे. उन्हाळ्यापूर्वी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण येईल. शहरात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी येईल. तूर्त ७०० मिमीची जुनी जलवाहिनी काही दिवस सुरू ठेवण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यातशहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात असून, आंध्र प्रदेशातील मजुरांकडून रखडलेल्या जलकुंभांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी नमूद केले की, ४० मजुरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. त्यामुळे तीन जलकुंभांची कामे लगेचच सुरू होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी