शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

५५० शिक्षक रजेवर !

By admin | Published: January 17, 2017 10:47 PM

लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील चार उमेदवार रिंगणात आहेत

लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील चार उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे या उमेदवारांचे समर्थक म्हणून शेकडो शिक्षक औरंगाबादला गेले असून, जिल्ह्यातील जवळपास ५५० शिक्षकांनी रजा घेऊन उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शाळेला दांडी मारली आहे.लातूर जिल्ह्यात माध्यमिकच्या ६३१ शाळा आहेत. तर ७ हजार ५४३ शिक्षकांची संख्या आहे. बहुतांश शिक्षक कोणत्या ना कोणत्या शिक्षक संघटनेत आहेत. या संघटनांचा काही उमेदवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५५० शिक्षक रजेवर आहेत. शाळा बुडवून शिक्षकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे निर्देश दिले असतानाही ५५० शिक्षकांनी रजा घेतली आहे. रजेचा अधिकार अबाधित ठेवून निवडणूक आयोगाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हे शिक्षक औरंगाबाद सहलीवर आहेत. लातूर जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी चार उमेदवार आहेत. त्यात विद्यमान आमदार विक्रम काळे, शिक्षक काँग्रेसचे राज्याध्यक्ष कालिदास माने, भारिप-बहुजन महासंघाचे प्रा. भालचंद्र येडवे, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संग्राम मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक शिक्षक लातूर जिल्ह्यातून औरंगाबादला गेले असल्याचे बोलले जात आहे. जी शाळा सहा शिक्षकांची आहे, त्या शाळेत दोनपेक्षा अधिक शिक्षकांना रजा देऊ नये, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे पालन करून शिक्षक संघटनांचे पदाधिकारी रजा घेऊन उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी औरंगाबादेत गेले असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)