शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरावीच्या ४४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ७२ हजार जागा

By राम शिनगारे | Updated: May 30, 2024 20:25 IST

मिशन ॲडमिशन; केंद्रीय नव्हे महाविद्यालय पातळीवरच होणार प्रवेश, विद्यार्थ्यांसह पालकांची प्रवेशासाठी धावपळ

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ४४४ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांना तब्बल ७२ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. त्यात शहरातील ११९ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश असून, खासगी शिकवणी लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडेच असल्याचेही समोर आले आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश होता. मात्र, उपलब्ध असलेल्या जागांएवढीही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होत नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया बंद केलेली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष महाविद्यालय पातळीवरच प्रवेश करण्यात येतात. दहावीचा निकाल २७ मे रोजी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असून, जुलैमध्ये नियमित तासिकांना सुरुवात होईल. जिल्ह्यात अकरावीच्या तिन्ही शाखांच्या ७२ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्याचवेळी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या १० हजार जागा शिल्लक राहणार आहेत. त्यातच दहावीनंतर पॉलटेक्निक, आयटीआयलाही शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतात.

जिल्ह्यात शाखानिहाय प्रवेश क्षमताशाखा.......अनुदानित...................विनाअनुदानित.......एकूणकला..........१२,८०........................१६,४८०................१७,७६०वाणिज्य.....२८००..........................४६८०..................७४८०विज्ञान........१३,२००........................२२,८४०..............३६,०४०एकूण.........२८,८६०........................४४,०००..............७२,८६०

महाविद्यालयाच्या पातळीवरच प्रवेश प्रक्रियाशहरासह जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशांना सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयाच्या पातळीवरच ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याठिकाणीच नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. सुरुवातीला अनुदानित जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. त्यानंतर विनाअनुदानित जागेवर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय