शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

७८ शहर बसेस सेवेत

By admin | Published: March 20, 2016 11:50 PM

औरंगाबाद : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदमुळे एस.टी.महामंडळ खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवारपासून ७८ शहर बस चालविण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदमुळे एस.टी.महामंडळ खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवारपासून ७८ शहर बस चालविण्यात येणार आहेत. यासाठी चालक-वाहकांच्या उपलब्धतेसाठी सिडको बसस्थानकातील लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीची जबाबदारी अन्य आगारांवर सोपविण्यात आली आहे.२१ ते २३ मार्चदरम्यान रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाने शहर बसच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मीटर सक्तीच्या निर्णयामुळे १५ मार्चपासून शहर बसची संख्या २९ वरून ५१ करण्यात आली. या ५१ शहर बसेसद्वारे विविध मार्गांवर १ हजार २९ फेऱ्या करण्याचे नियोजन महामंडळाने केले. आता रिक्षा बंद आंदोलनामुळे शहर बसची संख्या ५१ वरून ७८ करण्यात येत आहे. ७८ बसेसद्वारे १ हजार ५४५ फेऱ्या करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अन्य आगारांमधून चालक-वाहक येत आहेत. रिक्षा बंदमुळे एस.टी.ने जोरदार तयारी केली आहे.सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन अन्य आगारांवर देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ शहर बससेवा सुरळीतपणे चालविण्यावर सिडको बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करता येणार आहे.