शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पर्यटनासाठी सिक्कीमला गेलेल्या सिल्लोडच्या दोन कुटुंबातील ८ सदस्यांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 17:16 IST

पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कोणाचाही संपर्क झाला नसल्याचे सिक्कीम प्रशासनाने कळवले आहे

सिल्लोड: सिक्कीम मध्ये अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला आहे.यामुळे पर्यटनासाठी गेलेले सिल्लोड शहरातील दोन कुटुंबातील ८ लोकांशी संपर्क तुटला आहे. कुटुंबाच्या विनंतीवरून अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क साधला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

नंदकिशोर सहारे यांचे पुतणे कुणाल सुरेश सहारे (३९) त्यांची पत्नी राजश्री (३८) मुलगा सर्वांष (११), मुलगी साईशा ( दीड वर्ष) आणि शहरातील स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल) (३९) त्यांची पत्नी शितल (३६) मुलगी मोक्षा (१२),मुलगा सिद्धांत (९) हे सर्व सिल्लोड येथून २९ सप्टेंबर रोजी दार्जिलिंग, सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेले. ते सिक्कीम मधील हॉटेल यशश्री लचुंगमध्ये थांबले होते. २ ऑक्टोबर पर्यंत त्यांचा येथील नातेवाईकांसोबत संपर्क झाला. सिक्कीम येथे महापूर आल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी त्यांनी मेसेज करून आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचे कळवले. मात्र, तेव्हापासून दोन्ही कुटुंबाचा संपर्क होऊ शकला नाही. 

घाबरलेल्या नंदकिशोर सहारे यांनी तात्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार व खासदार रावसाहेब दानवे यांना संपर्क साधून मदतीची विनंती केली. मंत्री सत्तार यांनी लागलीच सिक्कीम सरकारला अडकलेल्या आठही जणांचा शोध घेण्याचे पत्र दिले. दरम्यान, तेथील कमिशन यांच्याशी मंत्री सत्तार यांचे बोलणे झाले असून त्यांनी पूरस्थितीमुळे अनेकांचे संपर्क तुटले असून मदत कार्य सुरू असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsikkimसिक्किमfloodपूरAbdul Sattarअब्दुल सत्तार