शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे केले जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:05 AM

सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची ...

सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने मागील खरिपात पिकविलेले सोयाबीन बियाणे जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. कृषी विभागाच्या अवाहनामुळे तालुक्यातील ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून शेतात पेरणी केले. तसेच विक्री करून पैसे मिळविले आहेत.

कपाशी पिकावरील खर्च, बोंडअळीचा हल्ला तसेच मजुरीचा प्रश्न याप्रमाणेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव व भावातील चढ-उतार यामुळे सोपे व सुटसुटीत असलेले सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खर्च कमी, उत्पादन चांगले व भावही मिळत असल्याने तालुक्यात यंदा सोयाबीन पेरा वाढला आहे. मागील हंगामात काही कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच बियाणांचा तुटवडाही जाणवला होता. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत: उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे म्हणून जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करून ते कसे जतन करावे, याबाबत मार्गदर्शन केले होते. यामुळे तालुक्यातील सुमारे ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन केले होते. त्यापैकी २५०० क्विंटल बियाणे आठ हजार ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केले. तर उर्वरित शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात पेरणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.

चौकट

सिरसाळा तांडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा तांडा येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी जमिनीचे आरोग्य चांगले राहावे म्हणून जैविक पद्धतीचा अवलंब, जैविक संघाची बीज प्रक्रिया, नाडेप, गांडूळ खत, मकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी डापके, कृषी सहायक सारिका पाटील, पोलीस पाटील महारू पवार, एम. बी. पाटील, विनायक परदेशी, अजय राठोड, गजानन राठोड आदी उपस्थित होते.

020721\img-20210701-wa0292.jpg

कॅप्शन

सिरसाळा तांडा येथे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी व मान्यवर दिसत आहे