शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 6:26 AM

ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात  एक सक्षम पर्याय निर्माण  करणार आहोत. या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर  आश्वासक उमेदवार देऊ. ‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.  शंकरअण्णा धोंडगे, भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, यादव कांबळे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी