शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

By admin | Published: November 10, 2014 11:48 PM

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़ काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे़यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रबीचा हंगाम धोक्यात आला असून, उपलब्ध पाण्यावर अनेकांनी रबीची पेरणी केली आहे़ मात्र, कमी प्रमाणात असलेली थंडी आणि जलस्त्रोतातील अपुरे पडत असलेले पाणी यामुळे रबी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत़ ज्वारीसह तूर, हरभरा आदी पिकेही पाण्याअभावी कोमेजू लागली असून, रोगराईचाही प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला़ उस्मानाबाद शहरासह येडशी, बेंबळी, अंबेवाडी, रूईभर, देवळाली, शिंगोली वडगाव सह ढोकी गोवर्धनवाडी, तडवळा आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ रात्री उशिरापर्यंत शहरासह परिसरात पावसाची हजेरी कायम होती़ कळंब शहरासह खामसवाडी, शिराढोण, येरमाळा, उपळा, रत्नापूर, पानगाव, चोराखळी, सापनाई आदी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ गंभीरवाडी शिवारात मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या़ तर शिराढोण, घारगाव परिसरात दुपारी व सायंकाळीही पाऊस झाला़ शिवाय तुळजापूर शहरासह परिसरात तसेच तामलवाडी, सांगवी काटी, सुरतगाव, माळुंब्रा, धोतरी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, सावरगाव, धोत्री आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ वाशी शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली़ परंडा, उमरगा, लोहारा या तालुक्यातील काही भागात काही वेळ रिमझिम पाऊस झाला़ तर शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ एकूणच उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी परिसरात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारी, तूर, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ मात्र, पिकांचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी मोठ्या पावसाची आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा कायम आहे़दरम्यान, कळंब तालुक्यातील ईटकूर, आंधोरा परिसरातही रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अन्य भागातही आकाशात ढग तसेच विजांचा कडकडाट सुरू होते. भूम शहरातही किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्या. (प्रतिनिधी)