शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

विजचोरांना दणका! महावितरणच्या धडक मोहिमेत ११७ जणांवर कारवाई

By साहेबराव हिवराळे | Published: September 28, 2022 5:44 PM

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे.

औरंगाबाद : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने राबविलेल्या धडक मोहिमेत मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची ११७ प्रकरणे शहरात उघडकीस आली आहेत. या सर्वांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे. यात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील भागात विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रत्येक वाहिनीवर दोन ते तीन पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच याकामी भरारी पथकांचेही साह्य घेतले जात आहे. शून्य, १ ते ३०, ३१ ते ५० तसेच ५१ ते १०० युनिट वीजवापर असलेल्या वीजग्राहकांची पडताळणी केली जात आहे. तसेच वीजचोरीची गुप्त माहिती व तक्रारींवरही कारवाई केली जात आहे. यात संशयास्पद मीटर जप्त करून महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे.

औरंगाबाद शहरात राहुलनगर, रोशनगेट, गणेश कॉलनी, जकात नाका, जसवंतपुरा, मोंढा व निजामुद्दिन या विद्युत वाहिन्यांवर १ सप्टेंबरपासून राबविलेल्या मोहिमेत वीजचोरीचा संशय असलेले १४९ मीटर जप्त करण्यात आले. तपासणीअंती यातील ११७ मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार करून जवळपास एक लाख युनिटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

बिल भरेपर्यंत वीज खंडित..ही बिले त्यांनी २४ तासांत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच वीजचोरीचे बिल भरेपर्यंत त्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण