शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
2
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
3
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
4
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
5
हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?
6
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
7
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
8
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 7:14 PM

साखरेची मागणी वाढणार असल्याने भारताला साखर निर्यातीची मोठी संधी

ठळक मुद्देमागील वर्षीच्या दुष्काळामुळे मराठवाड्यात उसाचे उत्पादन घटले.

- स.सो. खंडाळकर 

औरंगाबाद : जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे मराठवाड्यात उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपासून कुठल्याच सहकारी साखर कारख्यान्यात बॉयलर पेटण्याची शक्यता  कमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजी साखर कारखाना सुरू होऊ शकतो. तो विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अधिपत्त्याखाली चालतो. अन्य साखर कारखान्यांना ऊसच उपलब्ध नाही. 

यंदा परतीचा व नंतर अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे रान दुरुस्त करायलाच अवधी लागेल व त्यानंतर उसाची लागवड केली जाऊ शकते. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केल्यास एकीकडे महापूर व दुसरीकडे दुष्काळ यामुळे राज्यातील उसाच्या उत्पादनात यंदा तीनशे लाख टनांनी घट येण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनही ५० लाख टनांनी घटेल, अशी माहिती मिळत आहे. राज्यात सुरुवातीच्या अंदाजानुसार ८४३ लाख टन उसाची उपलब्धता ५७० लाख टनांवरून आता ५०० लाख टनांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच परिस्थिती कमी-अधिक  प्रमाणात देशातही आहे. मागील हंगामात देशात ३२६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात तब्बल ९५१ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

यावर्षी खरेतर तीच स्थिती होती. मात्र, दुष्काळाने आणि महापुराने उत्पादनाच्या विक्रमावर पाणी फिरवले. येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम  घेतलेल्या १९५ साखर कारखान्यांपैकी किमान ५० कारखाने बंद राहतील. उरलेल्या कारखान्यांना त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही. यावर्षी साखरेचे उत्पादनही ५५ लाख टनांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक स्तरावर गेल्या वर्षातील अतिरिक्त साखर उत्पादनानंतर यंदा उत्पादन ६० ते ६५ लाख टनांनी कमी होणार आहे. अशा स्थितीतही साखरचे मागणी कायम राहून पुरवठा अपुरा राहणार आहे. त्यामुळे भारताला निर्यातीची संधी अधिक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

साखर सहसंचालकपद रिक्त गेल्या सहा महिन्यांपासून औरंगाबादचे साखर सहसंचालकपद रिक्त आहे. हे कार्यालय क्रांतीचौकात आहे. या पदावर कार्यरत महिला अधिकारी येथून बदलून गेल्यापासून ते रिक्तच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांची संख्याही पुरेशी नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद