शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 9:09 PM

'ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील.'- आदित्य ठाकरे

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची मुठ बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. ही यात्रा आज औरंगाबाद शहरात आली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का? यावळी आदित्य ठाकरे यांनी शहराला दिलेल्या निधीचा उल्लेख केला. ते म्हाले, 'आम्ही शरहाला 552 कोटींचा फंड शहराला दिला. 100 कोटी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिले. धक्का याचा लागला की, ज्यांना आपले समजलो त्यांनीच घात केला. बंडखोरी पूर्वी तात्पुरते सत्तेत असलेले गद्दार आमदार माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे फाटले आहेत. ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आज आम्हाला धमक्या देत आहेत. मला जनतेने दिलेले असुड मी चालवणार नाही, कारण आता लोकशाही आहे. मतदारांनी मतदानातून धडा शिकवावा,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

संबंधित बातमी- 'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

'बेकायदेशीर सरकार कोसळणारच...'ते पुढे म्हणाले की, हात जोडून सर्वांना शिवसैनिकांनी विचारावे गड्डारी का केली? ज्यांनी ओळख दिली त्या उद्धव यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही जास्त दिल्याने यांना अपचन झालं, आता जेलुसिल घ्यायला हे तिकडे गेले. मला अनेकांनी सांगितलेलं राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, म्हणून बाळासाहेबांच्या मुलाला पायउतार केलं ते हेच दाखवायला की चांगल्याना स्थान नसतं. देशभरात झालेल्या अनेक सर्व्हेतून पुढे आलं आहे की काम करणारा सीएम हीच उद्धव यांची ओळख. आता आलेलं सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, हे सरकार लवकरच कोसळणारच,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..?ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतील खाती यांना दिली, पण तरीदेखील त्यांच्यात नाराजी होती. एवढं देऊन माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला. जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य असेल. ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद