शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

By मुजीब देवणीकर | Published: May 20, 2024 3:56 PM

हिमायत बागेतील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वनसंपदा लाभलेल्या हिमायत बागेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात. प्रशासनाने शनिवारी अचानक हिमायत बागेतील अंतर्गत सर्व कच्चे रस्ते खोदून ठेवले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर काही ठिकाणी बाभळीचे काटेही टाकले. फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे आत जाताच आले नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते जसेच्या तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात आता ऑक्सिजन हब उरले नाहीत, त्यामुळे हिमायत बागकडे एक मोठे ऑक्सिजन हब म्हणून बघितले जाते. वर्षानुवर्षे या ठिकाणी शेकडो आबालवृद्ध सकाळी-संध्याकाळी वॉकसाठी येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी अनेकदा इतिहासप्रेमींनी वॉक कार्यक्रमही आयोजित केले.

साधारण ३०० ते ४०० वर्षे जुनी झाडे या ठिकाणी आहेत. अत्यंत प्रसन्न, शांत वातावरण असते. आरोग्य जपण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी अनेक नागरिक येथे वॉकसाठी येतात. शनिवारी सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी आले तेव्हा सर्व बाजूने खड्डे खोदून ठेवल्याचे दिसले. काही ठिकाणी बाभळीचे काटे टाकले होते. नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. हिमायत बाग प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते उपलब्ध झालेे नाहीत.

कोणाच्या इशाऱ्यावर हे कृत्य?हिमायत बाग प्रशासनाने विविध फळ विक्रीचे वार्षिक कंत्राट दिले आहे. कंत्राट घेतलेल्या व्यक्तींना हिमायत बागेत सर्वसामान्य नागरिकांनी येऊच नये असे वाटते. त्यांनी यापूर्वी अनेकदा नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर प्रशासन नाचत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

रस्ते जसेच्या तसे करून द्याहिमायत बागचे प्रशासन परभणी कृषी विद्यापीठांतर्गत चालते. हिमायत बाग परिसर जैवविविधतेअंतर्गत येतो. त्यामुळे रस्ते जसेच्या तसे करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- प्रा. मकसूद दायमी, नागरिक

संयमाचा अंत पाहू नयेसुशिक्षित आणि विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर असलेले नागरिक येथे येतात. वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढणे चुकीचे आहे. हा परिसर खासगी नाही. शासनाचा आहे. नागरिकांना वॉकसाठी अडविता येत नाही. हिमायत बाग प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये.- अय्युब खान, नागरिक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन