शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर १२५ कोटींच्या रस्त्यावरून युतीत सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:41 IST

यादीच निश्चित होत नसल्याने पुढील प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देशिवसेना, भाजपच्या झाल्या स्वतंत्र बैठका  रस्ता निवडण्यात पुन्हा वॉर्ड, मतदारसंघाचा विचार, 

शहराची प्रतिमा उंचावण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

औरंगाबाद : शहराची प्रतिमा उंचावेल यादृष्टीने १२५ कोटी रुपयांमध्ये रस्त्यांची कामे करा, अंतर्गत रस्त्यांची कामे नंतर करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. सर्वपक्षीय नेत्यांनी बसून यादी तयार करण्याचे सोडून शिवसेनेने रस्त्यांसाठी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. १२५ कोटी रुपयांमध्ये कोणते रस्ते गुळगुळीत करायचे, यावरून युतीत एकमत व्हायला तयार नाही, दोन्ही पक्षांत आतापासून जोरदार सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.१७ जून २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी दिल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये कोणते रस्ते गुळगुळीत करायचे, यावरून वाद विकोपाला गेला होता. बहुतांश नेते आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा विचार करून रस्त्यांची निवड करू लागले. ३० रस्ते कसेबसे निवडले. यामधील १५ रस्त्यांना तूर्त गुळगुळीत करण्याची गरजही नव्हती. राजकीय हट्टापोटी रस्त्यांची निवड करावी लागली होती. पुन्हा एकदा शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटी देण्याचा निर्णय घेतला. आता मनपा रस्ते कोणते असावेत, त्यासाठी खर्च किती येईल, याचा आराखडा तयार करण्यात मग्न आहे. मुख्यमंत्री शहराला आणखी निधी देणार हे सर्वश्रुत होते. मग मनपाने यापूर्वीच रस्त्यांची यादी का तयार केली नाही? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.असंख्य विघ्न : यादी तयार होईनाशहरातील सर्वाधिक वर्दळीचे रस्ते कोणते, पर्यटकांची वर्दळ ज्या रस्त्यांवर नेहमी असते असे रस्ते गुळगुळीत करावेत, अशी मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे. स्थानिक राजकीय मंडळी पुन्हा एकदा वॉर्ड, विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचा विचार करीत आहेत. शहराची गरज काय? याचा विचार कोणीच करायला तयार नाही. महापालिकेच्या निधीतून कधी रस्ते गुळगुळीत केले नाहीत. आता राज्य शासन भरभरून देत आहे तर ते खर्च करण्यात असंख्य विघ्न निर्माण होत आहेत. महापालिकेला रस्त्यांची यादी, अंदाजित खर्च याचा प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर करायचा आहे. यादीच निश्चित होत नसल्याने पुढील प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काममुख्यमंत्र्यांनी हा निधी शहरासाठी दिला आहे. त्याचा योग्य विनियोग होणेही तेवढेच गरजेचे आहे. शहरातील कोणते प्रमुख रस्ते आज गुळगुळीत करण्याची नितांत गरज आहे, याचा विचार प्रथम प्राधान्याने होईल. मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार यादी निश्चित करण्यात येणार आहे. युतीत कोणताही वाद नाही. आम्ही सर्व जण मिळून रस्त्यांची यादी लवकरात लवकर अंतिम करणार आहोत.    -विजय औताडे, उपमहापौर

सर्वांगीण विकासावर भरसर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन यादी तयार करण्यात येईल. मागील अनुभव डोळ्यासमोर ठेवून आठ दिवसांमध्ये यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून लवकरच मंजुरी मिळाल्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी १२५ कोटींच्या कामांचे नारळ फोडण्यात येणार आहे.- नंदकुमार घोडेले, महापौर  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीhighwayमहामार्ग