शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:07 AM

: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (दि.२१) पहाटे ४ वाजेपासून बससेवा सुरळीत झाली. तब्बल चार दिवसांनंतर एसटी बसस्थानकाबाहेर पडून रस्त्यावर धावली. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले.एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. तब्बल चार दिवस हा संप चालला. संपाला कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या चार दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यातील बसस्थानकांतून एकही बस रस्त्यावर आली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेण्यात आला.संप मागे घेण्यात आल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा औरंगाबाद विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना बससेवा सुरू करण्याचे नियोजन करावे,अशी सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केल्या. सूचनेनुसार वायुवेगाने घडामोडी घडत पहाटे ४ वाजेपासून विभागातील बससेवा सुरू करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद-सोलापूर, औरंगाबाद-पुणे बस बाहेर पडल्या. त्यानंतर इतर मार्गांवरील बससेवा सुरू झाल्या. चार दिवसांपासून ओस पडलेले मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक शनिवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दोन्ही बसस्थानकांत विविध ठिकाणी जाणाºया प्रवाशांची दिवसभर गर्दी दिसून आली.गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावरही आनंदाची लकेर पाहायला मिळाली. बससेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. पाचव्या दिवशीही संप चालू राहील, या अपेक्षेने खाजगी वाहतूकदारांनी गर्दीच्या मार्गावर अधिक वाहने सज्ज ठेवली होती; परंतु त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले.