शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 1:03 PM

मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ६ आमदार निवडून आले. त्यातील संदीपान भूमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. यानंतरही अन्य ३ आमदारांसह त्यांनी बंड का केले? यावर आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. स्थानिक नेतृत्व याला कारणीभूत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. औरंगाबाद जिल्ह्याला अनेक वर्षांनंतर दोन मंत्रिपदे शिवसेनेच्या निमित्ताने मिळाली. विकासकामांचा धूमधडाका शिवसेनेने सुरू केला. पालकमंत्री सुभाष देसाई विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवत असत. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवला. त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार असल्याची एकच चर्चा सुरू झाली. संदीपान भूमरे, प्रदीप जैस्वाल यांच्याबद्दल सर्वाधिक आश्चर्य व्यक्त केले जात होते. नेमकी ही परिस्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात ‘लोकमत’ने सेनेत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती. योग्य मान- सन्मान कधीच मिळाला नाही. पक्षाचा मोठा कार्यक्रम असताना व्यासपीठावर तर जागा मिळत होती, पण कार्यक्रम आ. अंबादास दानवे हायजॅक करीत होते.

ही आहेत कारणे...ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले की, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात स्थानिक आमदारांना अजिबात महत्त्व दिले गेले नाही. दानवे यांनीच सर्व कार्यक्रमावर अधिराज्य गाजवले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ८ जून रोजी सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेतही दानवे यांनी माईकचा ताबा सोडला नाही. त्यामुळेही सेना आमदारांची नाराजी बरीच वाढली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ