शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:22 IST

नैराश्य, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पती-पत्नीचे टोकाचे पाऊल

- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( औरंगाबाद) : आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक  घटना तालुक्यातील धावडा येथे घडली. या घटनेने गाव सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. इतके टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी  झाली आहेत.

सुरेखा संतोष दळवी ( ४१) व संतोष किसन दळवी ( ४५ दोघे रा.धावडा) असे मृत पती- पत्नीचे नाव आहे. सुरेखाने दोन दिवसांपूर्वी २० फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. १८ मध्ये विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.

कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊलया कुटुंबांवर बँकेचे व बचत गटाचे कर्ज होते. तिन एकर शेती. मार्च महिना जवळ आला. शेती मालाला भाव नाही. अशात कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. या नैराश्यातून त्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

मुल झाली पोरकीमयत पती- पत्नी पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीच लग्न झालेले आहे. त्यांच्या आत्महत्येने ही मुल पोरकी झाली असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. या कुटुंबाला आधाराची गरज असून यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

अद्याप कारण स्पष्ट झाले नाहीदोघा पती पत्नीने आत्महत्या केली आहे मात्र त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पोलीस या घटनेचा तपास करत आहे.त्यांच्यावर कर्ज होते  नैराश्य व आर्थिक विवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती आहे तपासाअंती काय ते कळेल.- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या