शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'आजन्म शिवसेनेतच'; मराठवाड्यातील तीनही खासदार ‘मातोश्री’सोबतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 14:27 IST

शिवसैनिकांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठीच आपण काम करीत आहोत.

औरंगाबाद : एकीकडे शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीने महाराष्ट्र हादरला असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांबाबतही संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने मराठवाड्यातील शिवसेनेच्या तीनही खासदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण शिवसेना आणि ‘मातोश्री’सोबतच असल्याचे सांगितले.

आजन्म शिवसेनेसोबतच राहणार : संजय जाधवमाझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला पक्षाने खूप काही दिले आहे. त्यामुळे आपण आजन्म शिवसेनेसोबतच राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना पक्षाचे अनेक आमदार व मंत्र्यांनी पक्षविरोधात बंड केले आहे. या अनुषंगाने गुरुवारी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी चालविले. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना खा. जाधव म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने खूप काही दिले आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आज कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, याची आपणास जाण आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने आपणास काय दिले आहे, याचाच विचार मनात असतो. पक्षाने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल मी समाधानी आहे. त्यामुळे आजन्म आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत. दुसरा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही. ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले आहे, त्या शिवसैनिकांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठीच आपण काम करीत आहोत. गुरुवारीच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आता आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जात असल्याचे जाधव म्हणाले.

आपले इमान ‘मातोश्री’च्याच चरणीउस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनीही आपले इमान हे कायम ‘मातोश्री’च्याच चरणी असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याची भूमिका गुरुवारी मांडली. शिवसेनेतील बंडाळीनंतर सोमवारी रात्रीच मुंबई गाठलेले खासदार राजेनिंबाळकर भूमिका अधिक स्पष्ट करताना म्हणाले, राजकारण शिकण्याच्या अगदी तरुणवयात असताना स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास दर्शवत २००९मध्ये आमदार म्हणून निवडून आणले. २०१४च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपल्यावरील प्रेम कायम ठेवले. २०१९मध्ये उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर पुन्हा विश्वास दर्शवत मोठी जबाबादारी दिली. लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणण्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. या बाबी आपण विसरू शकत नाही. त्यामुळे ठाकरे परिवार कोणत्याही प्रसंगात असो; आपण आज त्यांच्या बाजूने आहोत. भविष्यातही ठामपणे राहू, असे खासदार राजेनिंबाळकर म्हणाले.

मी शिवसेनेसोबतच : हेमंत पाटीलशिवसेनेच्या अनेक आमदार - खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असला, तरीही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे मात्र शिवसेनेसोबतच आहेत. मी ‘मातोश्री’वर एका बैठकीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यामुळे मी कदापिही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात येणार नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असून, कायम शिवसेनेसोबतच राहीन.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादHemant Patilहेमंत पाटीलSanjay Jadhavसंजय जाधवMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ