शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

वाळूजला नळांद्वारे येतेय अळ्यांयुक्त दूषित पाणी

By admin | Published: May 28, 2014 12:53 AM

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाळूजवासीयांना आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही अपुरे. काही खाजगी कंपन्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेत असल्या तरी त्यात गावातील काही वरिष्ठ मंडळी आडकाठी आणत आहेत. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. नळांद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असून पाण्याला उग्र वासही आहे. दूषित पाण्याची तक्रार देण्यासाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर गेले असता ते बंद होते. त्यांनी सरपंच रंजना भोंड यांना दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ पाहणी करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले. तरीही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोष जलशुद्धी केंद्रात गावाला एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असल्याने हे पाणी बंद करून स्वच्छ पाणी सोडण्यास सांगितले आहे. यात ग्रामपंचायतीचा दोष नसून एमआयडीसीचा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असून, त्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. बहुतेक एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रातच दोष असून शकतो, असे वाळूजच्या सरपंच रंजना भोंड यांनी सांगितले. (लोकमत ब्युरो) ग्रा.पं.चे दुर्लक्ष पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व कचरा असून दुर्गंधीही येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अनेक वेळा सांगूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. -संदीप पठारे, रहिवासी आरोग्याला धोका आठवड्यातून एकदा पाणी मिळते; पण ते अळ्यायुक्त व दूषित असते. पाणीटंचाई व ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आजार पसरण्याची शक्यता आहे. -नदीम झुमरवाला, रहिवासी