शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:31 IST

मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत राबविणार उपक्रम, एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

ठळक मुद्देउद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपक्रम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ‘अमेझिंग औरंगाबाद’ हा अनोखा उपक्रम राज्य शासनाच्या उद्योग विभाग, मसिआ, सीएमआय संघटनेच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे. देश-विदेशांतील गुंतवणूकदारांना औरंगाबादकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत काल गुरुवारी उद्योजक संघटनांच्या बैठकीत व्यक्त केला.

‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रमाबाबत गुरुवारी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सीएमआयएचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया, उपाध्यक्ष कमलेश धूत, तसेच उद्योजक मधुसूदन अग्रवाल, प्रकाश जैन, सुनील किर्दक, नंदकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते. या बैठकीत ‘अमेझिंग औरंगाबाद’ या उपक्रमाबाबत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. याशिवाय सीएमआयए, मसिआ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत काल झालेल्या या बैठकीत वीज दरवाढ आणि उद्योगांसंबंधीच्या काही मागण्यांबाबत उद्योगमंत्री देसाई यांच्यासोबत चर्चा केली.

भविष्यात औरंगाबाद हे विकास केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. औरंगाबादमध्ये आयटी, आॅटोमोबाईल तसेच पर्यटन क्षेत्रात विशेष काम करण्याची संधी आहे. आॅरिक, दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) देश-विदेशांतील अनेक कंपन्या येथे दाखल झाल्या आहेत. औरंगाबाद अमेझिंग या उपक्रमामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार येथे येतील, असा विश्वास उद्योजकांनी यावेळी व्यक्त केला.

वेरूळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे चीन, जपान येथील पर्यटक, तसेच गुंतवणूकदारांना औरंगाबादकडे आकर्षित केले जाईल. उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. जपान, कोरिया, थायलंड, मॅनमार, सिंगापूर, तसेच श्रीलंका आदी देशांना सोबत घेऊन औरंगाबादेत बुद्धिस्ट सर्किट स्थापन केल्यास गुंतवणूकदार आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपक्रमया उपक्रमाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचे उद्योग विभागाचे उद्दिष्ट आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा उपक्रम सुरू करण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, या उपक्रमाच्या नियोजनासाठी पुन्हा येत्या ५ मार्च रोजी बैठक आयोजित केली जाणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद