शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा

By बापू सोळुंके | Updated: March 31, 2024 17:31 IST

'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.'

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrkant Khaire) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वादावर रविवारी अखेर पडदा पडला. रविवारी सकाळी आ. दानवे यांनी खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या. खैरे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यात काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळण्यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाला खैरे यांनी दानवे यांना बोलावले नव्हते. तेव्हा खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, अशी नाराजी आ. दानवे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आपणही पक्षाकडे लोकसभेचे उमेदवारी मागितल्याचे पत्रकारांना सांगितले होते. उमेदवारी मिळावी, यासाठी दानवे यांनी दबावतंत्राचा वापरही केला होता. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

चार दिवसांपूर्वी पक्षाने खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतरही आ. दानवे यांनी खैरे यांचा नाही तर पक्षाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी पक्षप्रमुखांच्या आदेशाने दोन्ही नेत्यांची मुंबईत दिलजमाई झाली. रविवारी सकाळी आ. दानवे हे पुष्पगुच्छ, शाल आणि मिठाईचा बॉक्स घेऊन चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी खैरे यांना पेढा भरवला आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सचीव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.

खैरे यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार

यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, उमेदवारी मिळेपर्यंत आमच्यामध्ये स्पर्धा आणि नाराजी होती, आता ही नाराजी संपली आहे. मी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आणि छत्रपती संभाजीनगरचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. यामुळे खैरे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.

महायुतीकडे चार ताकदवान माणसंही नाहीतखैरे म्हणाले, आम्ही दोघे नेहमीच एकत्र असतो. अनेक निवडणुका चांगली प्लॅनिंग करून जिंकल्या आहेत. आता ही निवडणूकही जिंकू. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडे चार चांगली माणसेही नाहीत म्हणूनच त्यांना बाहेरून उमेदवार शोधावा लागतो अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४