शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 19:05 IST

मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात तणाव वाढला; मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली

सिल्लोड: सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान म्हणून उल्लेख करणाऱ्या माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी  गुरुवारी दुपारी १२ वाजता सिल्लोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

शहरातील शिवाजी पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे रूपांतर सिल्लोड तहसिल कार्यालयाजवळ सभेत झाले. मोर्चात पालकमंत्री अब्दुल सत्तार, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची उपस्थिती नव्हती. मात्र,  सर्वधर्मीय नागरिक, महिला मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी दानवे यांच्या विरोधात टोकाची टीका केली. दानवेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा ,दानवे यांनी बेताल वक्तव्य थांबवावे ,सिल्लोड तालुक्याची बदनामी करू नये नसता  रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. आजच्या निषेध मोर्चामुळे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब  दानवे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना दिसत आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार हारून शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांना देण्यात आले.

दानवेंची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातीलपालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भोकरदनमध्ये लक्ष द्यावे. आम्ही सिल्लोड साभाळून घेऊ. संतोष दानवे विधानसभेत कसे निवडून येतात हे पाहतो, असे आव्हान जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे यांनी दानवे यांना दिले. तर सिल्लोड जर पाकिस्तान आहे तर रावसाहेब दानवे हे या लोकसभा मतदार संघात उभे का राहिले? त्यांना लोकसभा निवडणुकी पूर्वी येथील मतदान व  बिर्याणी चालत होती. त्यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोडची आहे, मग त्यांना पाकिस्तानमधील पत्नी चालते का असा टोला सुदर्शन अग्रवाल यांनी रावसाहेब दानवे यांना लावला.

या मोर्चास नंदकिशोर सहारे, केशवराव तायडे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, श्रीरंग साळवे, राजूबाबा काळे, मारोती वराडे, संदीप मानकर, दामूअण्णा गव्हाणे, रुपेश जैस्वाल, अकिल वसईकर, ऍड योगेश पाटील, रामदास पालोदकर,सुदर्शन अग्रवाल यांनी ही मार्गदर्शन केले. याप्रसंगी  अर्जुन पा. गाढे, केशवराव पा. तायडे,  श्रीराम महाजन , दारासिंग चव्हाण,  किशोर बलांडे , केतन काजे , बंडू पाटील शिंदे , देविदास लोखंडे, भाऊराव लोखंडे, किशोर अग्रवाल ,अशोक सूर्यवंशी, सतीश ताठे, विश्वास दाभाडे, डॉ. संजय जामकर, नाना  कळम, राजेंद्र ठोंबरे, दिलीप जाधव, राजू बाबा काळे, जितसिंग करकोटक, मुरलीधरराव काळे, मधुकर गवळी, राजू देशमुख, कौतिकराव मोरे, मनोज झंवर, अनिस पठाण,शेख सलीम हुसेन,  राजू गौर,  सत्तार हुसेन, नाना भवर ,रईस मुजावर ,आसिफ बागवान,सयाजी वाघ, बबलू पठाण,  हनिफ मुलतानी, नरसिंग चव्हाण  शंकरराव खांडवे ,विशाल जाधव, गौरव सहारे ,निजाम पठाण ,  प्रवीण मिरकर ,संतोष खैरणार,  आदींसह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबाद