शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

By विजय सरवदे | Published: May 30, 2024 7:26 PM

३१ मेपूर्वी आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करून घेण्याचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : इअर टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून पशुधनाच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली जाणार आहे. १२ अंकी असलेली ही इअर टॅगिंग म्हणजे जनावरांचे आधार कार्डच आहे. विशेष म्हणजे, हा टॅगिंग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक असणार आहे. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग केले नसेल, तर पशुपालकांनी ते ३१ मेपूर्वीच करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

आरोग्य सुविधांपासून कोणतेही पशुधन वंचित राहू नये, यासाठी आधार कार्डच्या धरतीवर पशुधनासाठी ईअर टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून वैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक साहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही.

- सर्व पशूंना इअर टॅगिंग आवश्यक

इअर टॅगिंगच्या माध्यमातून सर्व पशुधनाच्या नोंदी ठेववल्या जाणार आहेत. यात जन्म-मृत्यूची नोंद, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधी, मालकी हक्क हस्तांतरण यासह अन्य नोंदी असणार आहेत.

- पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक

सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी. जेणेकरून पशुधनांमधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशू व पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे इअर टॅग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- पशुधन खरेदी-विक्रीलाही प्रतिबंध

इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- एक जूनपासून अंमलबजावणी

एक जूनपासून सर्व पशुधनासाठी टॅगिंगशिवाय खरेदी-विक्रीला बंदी, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.

शासनाने इअर टॅगिंग सक्तीचे केले असून, त्यामुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी ३१ मेपर्यंत आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करावे.

- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र