शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

By सुमित डोळे | Updated: October 8, 2024 12:14 IST

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते.

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या शासकीय कामांच्या ठेकेदारांकडून निष्काळजीपणा केला जात आहे. वारंवार बजावून एकाही कामाची एनओसी वाहतूक पोलिसांकडून घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. परिणामी, गेल्या दोन महिन्यांत पाच नागरिकांचे जीव गेले. विशेष म्हणजे, मनपाने दिलेल्या कंत्राटदार कंपनीमुळे म़ृत्यूची ही दुसरी घटना आहे.

उलट बाजूने सुसाट जाणाऱ्या स्काॅर्पिओच्या (एमएच ०६ -एएन- ८०७६) धडकेत ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता हेमंत पाखरे (रा. पदमपुरा), राहुल लोदी (रा. केशरसिंगपुरा) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात पसार स्कॉर्पिओचालक व जलवाहिनीच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानुभाव चौकाकडून रेल्वेस्थानक रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. कंपनीने मात्र कुठल्याच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांना याबाबत कुठलीच कल्पना दिली नाही. दिशादर्शक फलक न लावता एक रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळवली. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना किंवा सुरक्षारक्षक तैनात केला नाही.

ठेकेदारांचा मनमानी कारभारजीव्हीपीआर कंपनीकडून शहरात ठिकठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे पाइप संपूर्ण शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर धोकेदायकरित्या थर रचून ठेवण्यात आले आहे. अन्य रस्त्यांच्या कामात देखील बेजबाबदारपणे खड्डे खोदून, तसेच सोडले जातात.

यापूर्वी ठेकेदारामुळे मृत्यू- जगन्नाथ कुलकर्णी (रा. नारेगाव) यांचा मुकुंदवाडी एसटी वर्कशॉप ते फॅक्सोप्लास कंपनी रस्त्यावर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला.- सिडको चाैकात जलवाहिनीच्या खड्ड्यात पडून राजू गायकवाड, या तरुणाचा मृत्यू झाला.- माळीवाडा पुलावर मातीऱ्या ढिगाऱ्याला धडकून आशिष सपकाळ (रा. पहाडसिंगपुरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात दौलताबाद ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा.

वारंवार समज पण...रस्त्यांवरील कुठल्याही कामासाठी वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना देऊन एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यात वाहतूक पोलिस ठेकेदारांना कामासाठी वेळ ठरवून देतात शिवाय सूचनाफलक, सुरक्षारक्षक, बॅरिगेड्स बंधनकारक करतात. मात्र, शहरातील एकाही शासकीय कामाबाबत ठेकेदारांनी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नाही. पोलिसांना न सांगताच सर्रास रस्त्यावर कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवले जातात.

कठोर भूमिका घेणाररस्त्यावरील कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आम्ही त्यानंतर आवश्यक अटी शर्थींसह परवानगी देतो, परंतु ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर कठोर भूमिका घेतली जाईल.- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघातDeathमृत्यूtraffic policeवाहतूक पोलीस