शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुम्ही पिताय ते पाणी फिल्टरचे की विहिरीचे ? प्रत्येक वसाहतीमध्ये एक जार सेंटर, नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:18 IST

बहुतांश विक्रेते विंधन विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. ग्राहक संख्या जास्त आहे, तेथे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो.

औरंगाबाद : महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नसलेल्या वसाहतींसह प्रत्येक व्यापाऱ्याकडे दुकानात पाण्याच्या जारचा वापर सुरू आहे. नेमके हे पाणी आहे तरी कुठले, याची साधी चौकशीही कोणी करीत नाही. नागरिकांना अवघ्या २० रुपयांमध्ये मिळणारे जारचे पाणी विहिरीचे आहे का विंधन विहिरीचे, हेसुद्धा शासकीय यंत्रणा तपासायला तयार नाही.

शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढतोय. प्रत्येक वसाहतीमध्ये किमान एका ठिकाणी तरी जारची विक्री होते. बहुतांश विक्रेते विंधन विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. ग्राहक संख्या जास्त आहे, तेथे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र, हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी अनेकजण प्रयोगशाळेमार्फत करीत नाहीत. पाणी शुद्ध करून विकणे हा एकमेव उपक्रम त्यांचा सध्या सुरू आहे.

पाण्यावर कमवतात पाण्यासारखा पैसा...शहरात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडे जास्तीचे पाणी नाही. त्यामुळे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे फावते. शहराच्या आसपास तयार होणाऱ्या नवीन वसाहती, व्यावसायिक अशा मंडळींनाच जार चालक पाणी विकतात. या व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

‘लोकमत’ने काय पाहिले?१) मुकुंदवाडी, गणेश कॉलनी, सिडको- एन-७, जटवाडा रोड आदी भागात विंधन विहिरीचे पाणी थेट जारमध्ये भरून विकायला नेण्यात येते. कुठेही पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा नाही.२) चिकलठाणा, गुलमंडी आदी भागात काही मंडळी सामाजिक दायित्व म्हणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पाण्याची विक्री करतात.

एक जार २० रुपयांना२० लिटरचा एक जार २० रुपयांना देण्यात येतो. व्यापाऱ्यांना दुकानावर दररोज एक किंवा त्यापेक्षा जास्त जार दिले जातात. अनेक वसाहतींमध्ये जार घरपोच दिले जातात. अनेक नागरिक स्वत: दुकानांवरून हे पाणी घरी नेतात.

जार व्यवसायावर नियंत्रण कोणाचे?अन्न व औषध प्रशासनाने पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. मात्र, या विभागाकडून आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून पाण्याची विक्री सुरू असल्याबद्दल एकाही जार चालकावर कारवाई झालेले नाही.

या पाण्याची कधी तपासणी होते का?महापालिका पाणीपुरवठा करण्यासाठी किमान चार ते पाच ठिकाणी पाण्याची तपासणी करते. खासगी जार चालक अजिबात तपासणी करीत नाहीत. संबंधित यंत्रणाही गांभीर्याने लक्ष देत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी