शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'वर्क फ्रॉम होम' संपवून इंजिनिअर जेवायला गेला; हॉटेल मालक समजून टोळक्याने खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:25 IST

'वर्क फ्रॉम होम' संपवून पहाटे झाल्टा फाटा येथील हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंताचा नाहक गेला जीव

छत्रपती संभाजीनगर : पहाटे जेवण्यासाठी शहराबाहेर गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा मालक समजून टोळक्याने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी दिली.

संतोष राजू पेड्डी (२८, रा. राजज्योती बिल्डिंग, उस्मानपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. ते रात्री उशिरापर्यंत वर्क फ्रॉम होम करत. पेड्डी कुटुंबाचा रोपळेकर हॉस्पिटल परिसरात डेअरीचा व्यवसाय आहे. त्यांचे कुटुंबीय लग्नानिमित्त हैदराबादला गेले होते. त्यामुळे संतोष घरी एकटे होते. ऑफिसचे काम पहाटेपर्यंत चालले. पहाटे संतोषना भूक लागली. त्यामुळे त्यांनी जवळ राहणारे गाडीचालक राधेश्याम अशोक गडदे (मूळ रा. मंठा) यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर दोघे फॉर्च्युनर कारने (एमएच १२, एफवाय ४१९४) जेवणासाठी बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथे गेले. यशवंत हॉटेलसमोर कार लावून आत घुसणार तेवढ्यात समोरून तिघांचे एक टोळके चाल करून आले. त्यांनी मालक समजून संतोषवरच हल्ला चढवला. त्यांनी मालक नसल्याचे सांगितले, तोपर्यंत टोळक्यातील एकाने संतोष यांच्या छातीत डाव्या बाजूला चाकू खुपसला. हा वार एवढा जोराचा होता की, थेट हृदयात घुसल्याने ते खाली कोसळले. चालकाने तत्काळ उचलून कारने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. घाटीतील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संतोष यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.

वाद दुसऱ्यांचा; बळी गेला भलत्याचापोलिसांच्या माहितीनुसार झाल्टा फाटा येथे बद्री शिंदे यांचे यशवंत हॉटेल आहे. त्याठिकाणी अगोदरपासून तीन मित्र जेवायला गेले हाेते. जेवणानंतर तिघांनी शीतपेय घेतले. त्याचे पैसे हॉटेल व्यवस्थापकाने मागितले. तेव्हा तिघांना राग आला. त्यांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेलमध्ये दहशत निर्माण केली. त्याचवेळी संतोष फॉर्च्युनरमधून उतरले. तेव्हा तिघांना वाटले की, हा हॉटेल मालक आहे. त्यामुळे तिघांनी संतोषवर हल्ला केला. त्यातच संतोषचा जीव गेला.

शांत अन् सर्वांना सहकार्य करणारासॉफ्टवेअर इंजिनिअर संतोष अतिशय शांत स्वभावाचे होते. मित्रपरिवारासह कुटुंबातही सर्वांना सहकार्य करणारे होते, अशी माहिती त्यांच्या काकांनी दिली. दरम्यान, संतोषचे आईवडील हैदराबादहून शहरात परतले असून, शनिवारी सकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

चिकलठाणा पोलिसांच्या दोघे ताब्यातचिकलठाणा पोलिसांनी संतोष खून प्रकरणात शहराबाहेरून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयितांची चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेचा आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चिकलठाणा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक समाधान पवार अधिक तपास करीत आहेत.

चार दिवसांत तीन खूनशहराच्या परिसरात चार दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.-हर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानात दिनेश ऊर्फ बबलू परमानंद मोरे (रा. चेतनानगर, हर्सूल) या तरुणाचा चार-पाच जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून २ डिसेंबर रोजी दुपारी खून केला.- मिसरवाडीतील सनी सेंटरच्या पाठीमागच्या मैदानावर विकास ज्ञानदेव खळगे (रा. मिसारवाडी) या तरुणाचा पाच जणांच्या टोळक्याने चाकू, तलवार आणि कुऱ्हाडीचे घाव घालून गुरुवारी रात्री खून केला.- सॉफ्टवेअर इंजिनिअरला संतोष राजू पेड्डी (रा. उस्मानपुरा) या तरुणाचा झाल्टा फाटा येथील एका हॉटेलमध्ये तीन जणांच्या टोळक्याने चाकू खुपसून ६ डिसेंबरच्या पहाटे खून केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू