शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पैसे देऊन लग्न जुळवले; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:24 AM

बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

वैजापूर, शिऊर : लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अंगावरील दागिन्यांसह नवरीने धूम ठाेकल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मनूर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी नवरीसह लग्न लावून देणाऱ्या बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरी नंदिनी राजू गायकवाड (रा. गांधीनगर, अकोट फैल, जि. अकोला), अनिल दिगंबर जोशी (रा. जवळी खुर्द, ता. कन्नड), मनीषा गजानन मानवते(रा. खामगाव, जि. बुलढाणा), पूजा विजय माने (रा. महाडीकवाडी, लिंगीवरे, जि. सांगली), रणजित (रा. हिंगोली, पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार मनूर येथील अंबादास विश्वनाथ दवंगे (वय २९ वर्षे) हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होता. परंतु त्याला मुलगी मिळत नव्हती. दरम्यान, नात्यामधील एका व्यक्तीने लग्न जुळवून देणाऱ्या रणजित नामक व्यक्तीशी अंबादास याचा संपर्क करून दिला. योग्य मुलगी मिळेल, परंतु त्यासाठी १ लाख ८१ हजार रुपये लागतील, असे रणजितने सांगितल्यानंतर अंबादासने होकार दिला. त्यानंतर दलालानेही नंदिनीची अंबादाससोबत भेट घालून दिली. १० एप्रिल रोजी दुपारी मनूर येथील एका मंदिरात या दोघांचा विवाहही पार पडला. लग्न लागताच रणजितने ठरलेली रक्कम अंबादासकडून घेऊन तो त्या सहकाऱ्यांसोबत तेथून निघून गेला.

मोटारसायकलवरून नवरी मध्यरात्री झाली गायबयाच दिवशी रात्री नवरदेव अंबादास घराच्या छतावर तर नववधू अंबादासची मावशी व इतर नातेवाईक महिलांसोबत घरात झोपली होती. दरम्यान, नवरी घरात नसल्याची ओरड मध्यरात्री सुरू झाली. गुरुवारी सकाळी नंदिनी अंगावरील दागिन्यांसह एका अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून निघून गेल्याचे तरुणाला समजले. याप्रकरणी दुपारी अंबादासने शिऊर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. त्यानुसार पोलिसांनी त्या सहा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी