शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
2
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
3
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
4
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
5
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
6
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
7
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
8
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
9
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
10
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
11
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
12
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
13
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
14
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
15
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
16
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
17
Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Photoshoot: दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
18
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
19
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
20
Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्...

समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

By विकास राऊत | Published: December 04, 2023 12:45 PM

नैसर्गिक फुलझाडे केव्हा वाढतील? आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटीझम’ला कोट्यवधी खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम आहे. वृक्षारोपणदेखील वर्षभरापासून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

समृद्धीचे ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण झाले. तेव्हापासून आजवर महामार्गावर झालेल्या अपघातांमुळेच हा मार्ग चर्चेत राहिला. मार्गाच्या आजू-बाजूला काहीही वृक्षवल्ली, हिरवळ चालकांना दिसत नसल्यामुळे ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मध्यंतरी काढला. आता नैसर्गिक हिरवळ तत्काळ वाढून मोठी होणे शक्य नसल्यामुळे हा कृत्रिम उपाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. त्यासाठी विविध प्रकारची शिल्प मार्गावर उभारण्यात येणार आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी याची मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले आहेत. रात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रस्ता संमोहन (‘रोड हिप्नॉटीझम’) होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी. अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो. त्यात आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर पडणार आहे.

कोण आहे कंत्राटदार....हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गणराज डेव्हलपर्स यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील शिल्पकार मेघराज शेळके यांना वैजापूर ते सिंदखेड राजापर्यंत काम करण्यासाठी उपकंत्राटदार म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांनी सांगितले, आर्टिफिशियल फुले, झाडांमुळे प्रवास करताना फायदा होईल. अपघात होऊच नयेत, यासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे.

समृद्धीने घेतले १२५ बळी...समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात सुमारे १२५ जणांचा बळी गेला आहे. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात