शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

इच्छुक उमेदवारांनी केली तलवार म्यान

By | Updated: December 2, 2020 04:12 IST

औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२१ मध्ये होईल, असा कयास लावण्यात येत असला तरी उमेदवारांना कसलीच शाश्वती राहिलेली ...

औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२१ मध्ये होईल, असा कयास लावण्यात येत असला तरी उमेदवारांना कसलीच शाश्वती राहिलेली नाही. निवडणूक लांबणीवर जाणार असे संकेत मिळू लागल्याने संभाव्य उमेदवारांनी वाॅर्डात पूर्वीसारखा संपर्क ठेवला नाही. कोरोना रुग्णांसाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे इच्छुक उमेदवार आता गायब झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे शासनाकडून आणि आयोगाकडून निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर निवडणूक आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, सर्वोच्च न्यायालयातील वाद कधी संपुष्टात येईल हेसुद्धा निश्चित नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या किमान दीड ते दोन हजार उमेदवारांनी सध्या तलवार म्यान केली आहे.

औरंगाबादेत मार्च महिन्यात कोरोना आजाराचे रुग्ण सापडत होते. तेव्हा प्रत्येक वाॅर्डात विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार रस्त्यावर उतरून गोरगरीब नागरिकांना आणि रुग्णांना मदत करीत होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेणे आणि डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला सुखरूप घरी आणणे ही कामेसुद्धा इच्छुक उमेदवार पार पाडत होते. लॉकडाऊनमध्ये इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाची गाडी घेऊन वाॅर्डातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्याचा विडाच अनेकांनी उचलला होता. महापालिका निवडणूक लांबणार असे वाटू लागल्याने इच्छुक उमेदवारांनी वाॅर्डात येण्याचे टाळणे सुरू केले. वाॅर्डातील कोणत्या नागरिकांना कोरोना झाला आणि ते कधी परत आले हे सुद्धा आता इच्छुकांना माहीत नाही. लग्नकार्य, अंत्यसंस्कार आदी कार्यक्रमांमध्ये इच्छुक उमेदवार सर्वात अगोदर दिसून येत होते. आता हळूहळू ते अंग काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.

काही उमेदवार अजूनही निवडणूक मैदानात

काही वाॅर्डांमधील विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार मैदान सोडायला तयार नाहीत. वाॅर्डामध्ये नित्यनेमाने येणे, नागरिकांच्या भेटीगाठी घेणे असे उपक्रम सुरु आहेत. निवडणुका होतील तेव्हा होतील पण आपण नागरिकांच्या संपर्कात कायम राहिले पाहिजे, या मताचे ते आहेत.

माहिती वकिलाकडे पाठविली

महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत महापालिका प्रशासनाने शपथपत्र दाखल करण्यासाठी वकिलाकडे संपूर्ण माहिती पाठवून दिली आहे. याचिकेची सुनावणी अद्याप बोर्डावर आलेली नाही.

सुमंत मोरे, उपायुक्त महापालिका.