शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश

By साहेबराव हिवराळे | Published: July 11, 2024 7:31 PM

वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा

छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यात वन परिक्षेत्रात नवनवीन वृक्षांच्या बिया रुजण्याच्या अवस्थेत असतात. या कोवळ्या रोपांवर पर्यटकांची पावले पडल्यास ती रोपे नष्ट होतात. परिणामी, नवीन वृक्षसंपदा वाढीस लागण्यात अडथळा येतो. यासोबतच पावसाळ्याचे तीन महिने हे जवळपास सर्वच पशुपक्षी, कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. पर्यटकांच्या उपस्थिती आणि हस्तक्षेपामुळे त्यांच्या क्रियेत बाधा उत्पन्न होते. यामुळे त्यांच्या वंशवाढीतही बाधा उत्पन्न होते. पर्यटक मंडळी वनक्षेत्रात मोठमोठ्याने आवाज करतात. यामुळे हे जीव घाबरतात. वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती वाढली असल्याने खबरदारी गरजेची आहे.

व्यवस्थापन आराखड्यातील तरतूद-वन्यजीव विभागाचे दर दहा वर्षांसाठी व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यात येतो.- २०१४-१५ ते २०२४-२५ या दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यातील बाब क्रमांक ३. ६ नुसार 

गौताळा औट्रमअभयारण्यात तीन महिने प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद आहे. या दोन कारणांखेरीज गौताळा वन परिक्षेत्रात अनेक धोकादायक स्थळे आहेत. नदी, नाले, दरी, मोठी झाडे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणून मागील वर्षीपासून ही बंदी करण्यात येते.

वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मागील वर्षी बंदी असूनही अनेक पर्यटकांनी गौताळ्यात पर्यटन केले होते. पर्यटक केरकचरा, अस्वच्छता, प्लास्टिक वस्तू टाकून पर्यावरणास धोका निर्माण करतात.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव संरक्षक

दक्षता घ्या..पर्यटकांनी स्वत:च्या आणि वन्यजिवांच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी.- एम. बी. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग