शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागाचा सहा वर्षातील सर्वात कमी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:01 IST

बारावीचा निकालात संपूर्ण राज्यात औरंगाबाद विभाग चौथ्या स्थानी

ठळक मुद्देमुलींचे वर्चस्व कायमविभागात औरंगाबाद जिल्ह्याची बाजी

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के निकाला नोंद करत राज्यात चौथे स्थान पटकावले. मात्र मागील २०१४ पासून सर्वात निच्चाकी निकालाची नोंदही यावर्षी झाली आहे.

बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान विभागातील ३८८ केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. यात १२४० कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६२ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी  विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी उपस्थिती होती. राज्याचा निकाल ८५.८८ टक्के एवढा लागला आहे. त्यातुलनेत औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के एवढा निकाल नोंदवला. मागील सहा वर्षातील हा सर्वात कमी निकाल आहे. २०१४ साली औरंगाबाद विभागाचा निकाल ९०.९८ टक्के एवढा लागला होता. त्यानंर २०१५ मध्ये ९१.७७, २०१६ मध्ये ८७.८०, २०१७ मध्ये ८९.८३, २०१८ मध्ये ८८.७४ आणि यावर्षी सर्वात कमी निकाल हा ८७.२९ इतकाच लागला आहे. त्यापुर्वी २०१२ मध्ये ६७.१० टक्के आणि २०१३ मध्ये ८५.२६ टक्के निकालाची नोंद झाली होती.

बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वात जास्त ८९.२२ टक्के निकाल लागला आहे. तर विभागात सर्वात कमी निकाल ८०.७७ टक्के हिगोंली जिल्ह्याचा लागला आहे. या निकालात बीड जिल्हा ८८.२७ टक्के, जालना ८७.१२ टक्के आणि परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के एवढा लागला आहे. मागील सहा वर्षात सर्वात कमी निकाल कॉपी मुक्त अभियान राबविल्यामुळे लागला असल्याचा दावा विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत केला. यावर्षीच्या परीक्षेत विभागातंर्गत सर्वच जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचे हे परिणाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विभागात मुलींची बाजी कायमबारावीच्या परीक्षेत विभागामध्ये मुलींनी यावर्षीही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.८६ असून, मुलांची ८५.०९ एवढी आहे. यात १ लाख ५६२ मुलांपैकी ८५ हजार ४१० मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या ६२ हजार ८४ पैकी ५६ हजार २९५ उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींनीच टक्केवारीत बाजी मारली आहे.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद