शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:24 IST

औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

ठळक मुद्देए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर : सुरक्षा व्यवस्थेकडे कानाडोळा, स्टेशन परिसर बनतोय बकाल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी अस्वच्छता, खड्डे, तुटलेले बॅरिकेटस्, ठिकठिकाणी वाळण्यासाठी टाकलेल्या कपड्यांनी रेल्वेस्टेशन परिसर बकाल होत आहे.ए-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे. या श्रेणीत समावेश झाल्यास अधिक गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु ५५ कोटींचे उत्पन्न देणाऱ्या रेल्वेस्टेशनवर सोयी-सुविधांत सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत दररोज हजारो प्रवासी, पर्यटक ये-जा करतात. परंतु रेल्वेस्टेशनची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करण्याची वेळ येत आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरील कमानीवरील फलकाची दुरवस्था झालेली आहे. या कमानीसमोरील रस्त्यावरील खड्डे आणि दगडांनीच प्रवाशांचे स्वागत होते. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोर कपडे वाळत घातले आहेत. हा प्रकार पाहून हे रेल्वेस्टेशन आहे की, धोबीघाट, असा प्रश्न क्षणभर ये-जा करणाºया प्रवाशांना पडतो. ठिकठिकाणी उघड्यावरच लघुशंका केली जाते. जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेजच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नव्या इमारतीसमोरील पोलीस चौकी बेवारस अवस्थेत असून अनेक जण अनधिकृत ताबा घेत आहेत. या चौकीचा आराम करण्यासाठी अनेकांकडून वापर केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील ही परिस्थिती दूर करण्याची मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.मेटल डिटेक्टर बंदरेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आले. परंतु आजघडीला ते बंदच असून, ते केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. याठिकाणी लावलेले लोखंडी बॅरिकेटस्ही काढण्यात आले. बॅरिकेटस्अभावी रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करणारे प्रवासी मेटल डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा धोक्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन