शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जगी ज्यास कुणीच नाही, अशा महिलांचा ‘आधारवड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 09:05 IST

मदर तेरेसा आश्रम म्हणजे ख्रिस्ती धर्मातील सेवाभाव असणारे स्थळ

ठळक मुद्देकित्येक महिलांना दिला आधारअनेकजणी बनल्या इतरांचा सहारा

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : प्रत्येकीची नवी व्यथा आणि वेगळी कथा. कोण-कुठल्या त्या सगळ्या जणी तेथे एकत्र आल्या. प्रत्येकीवर ओढवलेली परिस्थिती नाईलाजाने त्यांना तिथे घेऊन आली खरी, पण आता मात्र त्या एकमेकींमुळे हसणे शिकल्या, एकमेकींचा आधार बनल्या आणि एकमेकींच्या सोबतीने जगणे शिकल्या. येशूच्या प्रांगणात आणि मदर तेरेसा यांचा वारसा चालविणाऱ्या ‘सिस्टर’च्या सहवासामुळे शहरातील मदर तेरेसा आश्रम जणू ‘जगी ज्यास कुणी नाही’ अशा महिलांसाठी आधारवड बनला आहे.

सेंट अ‍ॅन रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अलीकडेच निळ्या रंगाचे प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते. बाहेरून पाहतानाही आतली निरव शांतता, शिस्तीत लावलेली झाडे आणि झाडांवर फुललेली वेगवेगळ्या रंगांची फुले मनाला प्रसन्न करून जातात. आत गेल्यावर सगळ्यात पहिले दिसणारा मदर तेरेसा यांचा शांत भाव असणारा पुतळा हाच या आश्रमातील सुप्त ऊर्जा असल्याचे सांगून जातो. मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या या मदर तेरेसा आश्रमात आजघडीला विविध आजारांनी ग्रासलेल्या १२० निराधार स्त्रिया राहत असून, ६ सिस्टर त्यांची अविरतपणे देखभाल करतात. 

आश्रमाविषयी सांगताना तेथील व्यवस्थापिका सिस्टर अंजली म्हणाल्या की, २५ वर्षांपूर्वी औरंगाबादचा हा आश्रम उभा करण्यात आला. पूर्वी येथे पुरुषांचीही सेवासुश्रूषा केली जायची; परंतु आता विभाजन झाले असून, पुरुषांना अन्य शहरांतील आश्रमात पाठविण्यात आले आहे. आता या आश्रमात केवळ महिलांची देखभाल केली जाते. ज्या महिलांना कुणाचाही आधार नाही, ज्यांना नातेवाईक असूनही विचारत नाही, अशा परिस्थितीतल्या आजारी महिलांवर  पैशाअभावी किंवा अन्य कारणांमुळे कोणत्याही रुग्णालयात इलाज होत नाहीत. अशा महिलांसाठी हा आश्रम असून, याठिकाणी या महिलांवर मोफत इलाज केले जातात. त्यांची सुश्रूषा केली जाते. बरे वाटायला लागल्यावर काही जणी आपापल्या गावी, नातेवाईकांकडे निघून जातात, तर ज्यांचे कुणीही नाही, अशा महिला याच आश्रमात राहतात.ठरविलेले डॉक्टर नियमित येऊन या महिलांची तपासणी करतात. याठिकाणी तीन ते चार वार्ड असून, यामध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. ज्यांची तब्येत थोडी बरी आहे, अशा महिला दुसऱ्यांची सुश्रूषा करण्यासाठीही मदत करतात. एवढे रुग्ण याठिकाणी राहतात, तरी येथे कमालीची स्वच्छता जपली जाते आणि आश्रमाची शिस्त सांभाळली जाते. 

आज सगळीकडे नाताळाची धामधूम सुरू आहे. कपडे, शोभेच्या वस्तू, मिठाईची दुकाने यामुळे सगळी बाजारपेठच सजली असून, सगळीकडे जोरदार खरेदी सुरू आहे. त्या तुलनेत नाताळ सण साजरा करायला या महिलांकडे फार काही साधने उपलब्ध नाहीत; पण तरी ‘येशू बाबा’च्या मूर्तीसमोर आम्हीही एकमेकींसोबत नाताळ साजरा करणार असल्याचे या महिलांनी आवर्जून सांगितले.

आम्हीच त्यांच्या ‘माँ’यापैकी अनेक जणी अशा आहेत, ज्यांना आईचे प्रेम माहितीच नाही. अगदी लहान वयापासूनच इथे आलेल्या काही जणी आहेत त्यांना आम्हीच त्यांच्या जवळचे वाटतो. त्यांच्या लेखी आम्हीच त्यांचे पालक असून, त्या आम्हालाच ‘माँ’ म्हणून हाक मारतात, असे सिस्टर अंजली यांनी सांगितले.

टॅग्स :ChristmasनाताळAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक