शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबाद नामांतराचा वाद; खबरदारी म्हणून रेल्वेस्टेशनवरील नामफलकाला चक्क संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 20:40 IST

Aurangabad renaming dispute : खबरदारी घेत लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून गस्त

ठळक मुद्देफलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर रेल्वेस्टेशनवरील नामफलकाचीही सुरक्षा करण्याची वेळ सध्या लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलावर ओढावली आहे. कारण शहराच्या नामकरणावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले आहे. यातूनच रेल्वेस्टेशनवरील औरंगाबाद नामफलकाला चक्‍क संरक्षण देण्यात येत आहे.

नामकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. या फलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा देत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली. यापूर्वी रेल्वेस्टेशनवरील नामफलकावरील नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या मुद्याला तोंड फुटले आहे. शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसने औरंगाबादचे नामाकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यातच मनसेने शहरात औरंगाबादच्या नामाकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. या सगळ्यात रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबाद नामफलकाला सुरक्षा देण्यात आली आहे.

रिकामे फलाट तरीही...रेल्वेस्टेशनवरून सध्या मोजक्याच रेल्व धावत आहे. रेल्वेचे फलाट रिकामे असल्यावर सुरक्षेचा फारसा मुद्दा येत नाही. पण रिकाम्या फलाटाच्या शेवटच्या टोकावर सध्या नामफलकाजवळ लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना उभे रहावे लागत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन