शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:31 IST

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे.

औरंगाबाद : सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील आणि गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानानेऔरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या आठवड्यात घसरले होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. शहरात रविवारी ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. दुसऱ्याच दिवशी २५ एप्रिलला तापमानात ३.२ अंशांनी वाढ झाली आणि ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यानंतर आता अवघ्या दोन दिवसांत तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेला आहे.शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या झळामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर तुरळक वर्दळ पाहायला मिळत आहे. सकाळी ११ ते ४ वाजण्याच्या दरम्यान चटके तीव्रतेने जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक या वेळेत बाहेर पडण्याचे टाळत आहेत. ऊन कमी झाले तरी सायंकाळनंतर वातावरणातील उकाडा कायम राहतो आहे.

भारनियमन नसल्याने दिलासाऐन उन्हाळ्यात भारनियमनामुळे नागरिकांना दुपारी, सायंकाळी आणि रात्री उकाड्याला सामोरे जावे लागले. परंतु, गेल्या २२ एप्रिलपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर, तसेच कृषिपंपांना वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री आठ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. अखंडित वीजपुरवठ्याची ही परिस्थिती बुधवारीदेखील कायम होती व कुठेही भारनियमन करण्यात आले नाही, अशी माहिती महावितरणने दिली.

यापूर्वी एप्रिल महिन्यातील तापमान- २८, २९ एप्रिल २०१९- ४३.६ अंश-१७,१८ एप्रिल २०२०-४०.८ अंश-२९ एप्रिल २०२१-४०.६ अंश

आगामी दिवसांतील तापमान (अंश सेल्सिअस)तारीख- किमान- कमाल तापमान२८ एप्रिल-२५.०-४२.०२९ एप्रिल-२६.०-४१.०३० एप्रिल -२६.०- ४०.०१ मे -२५.०-४०.०२ मे -२४.०-३९.०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात