शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

औरंगाबादकरांनी खूप दिलं,पण शिवसेनेनं शहराला काय दिलं?; पाणी प्रश्नावरून फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 7:13 PM

जनतेचा आक्रोश सरकारला खाक करेल, पाणी प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जनता पाण्यासाठी तरसत आहे. या शहराने शिवसेनेला खूप दिले पण शिवसनेने त्यांना काय दिले. हा मोर्चा व्यवस्था बदलण्यासाठी आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जल आक्रोश मोर्चात बोलताना केला.

औरंगाबाद शहरात पाण्याच्या प्रश्न बिकट झाला आहे. आठ ते दहा दिवसांनी होणारा अपुरा, कमी दाबाने होणार पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे अनेक अडचणी येत आहेत. शहरात पाणी प्रश्न सुटावा यासाठी भाजपने आज जल आक्रोश मोर्चा काढला आहे. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लबोल केला. ते म्हणाले, शहरासाठी १६०० कोटी रुपयांची पाणी पाणी पुरवठा योजना आमच्या काळात मंजूर करण्यात आली मात्र, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. आता या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या वेगाने काम होत राहिले तर २५ वर्ष लागतील. हा मोर्चा भाजपाचा नसून जनतेचा आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल. शिवसेनेला शहराने खूप दिले पण त्यांनी शहराला काय दिले असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. 

हंडे घेऊन महिलांचा सहभाग मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला रिकामे हंडे घेऊन मोर्चात सहभागी आहेत. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शहराचे, उद्योगांचे मोठे नुकसान पाणी प्रश्नामुळे होत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.    

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस