शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारल्यावरही देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य स्तंभ उभारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 4:39 PM

तगडा पोलिस बंदोबस्त पाहून बजरंग दलाने माळीवाड्यात उरकला कार्यक्रम

दौलताबाद/ छत्रपती संभाजीनगर : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, स्वराज्य तोरण प्रतिष्ठान आदी संघटनांनी गुरुवारी दौलताबाद (देवगिरी) किल्ल्यावर आयोजित केलेल्या स्वराज्य प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली. तरीही या संघटनांचे कार्यकर्ते सकाळी दौलताबाद परिसरात जमा होऊन स्वराज्य स्तंभ उभारणीचा प्रयत्न झाला. मात्र, तगडा पोलिस बंदोबस्त पाहून कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि माळीवाड्यामध्ये कार्यक्रम उरकण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाळगड- गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा बंदोबस्त लावल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दौलताबाद किल्ल्यावर कार्यक्रमासाठी पुरातत्त्व विभाग व पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती, तरीही सकाळी १० वाजेच्या सुमारास संजय बारगजे, भाजपचे संजय केणेकर, ह. भ. प. मेटे महाराज, श्रवण चैतन्य महाराज, सुदर्शन महाराज, नेताजी पालकर यांचे वंशज विक्रम पालकर, मनीष पाटील, राहुल भोसले, अशोक मुळे, उद्धवसेनेचे राजू शिंदे यांच्यासह ४०० हून अधिक कार्यकर्ते दौलताबादमध्ये जमा झाले. कार्यकर्त्यांनी जमावे म्हणून पाच दिवसांपूर्वी हेडगेवार रुग्णालयातील सभागृहात एक बैठकही घेण्यात आली होती. शिवभक्तांनाही या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी सोशल मीडियावरून जोरदार मोहीम राबविण्यात आली होती.

कार्यकर्ते पोहोचल्यानंतर दौलताबादमधील छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. कार्यकर्त्यांसमवेत स्वराज्य तोरण प्रतिकृती होती. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त पाहून हे सर्व कार्यकर्ते वाहनांनी तसेच पायी दौलताबादहून माळीवाड्यात गेले. तिथे एका हॉलमध्ये स्वराज्य तोरण सोहळा साजरा करण्यात आला. दौलताबादमध्ये थोडासा तणाव दिसला. अनेक हॉटेलचालक आणि दुकानदारांनी सकाळी आपली दुकाने बंद ठेवली होती. किल्ला परिसरातील दुकाने मात्र चालू होती.

संघटनांच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आयोजक व पुरातत्त्व खात्याच्या पदाधिकाऱ्यांची आधीच समन्वय बैठक आयोजित केली होती. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा आयोजकांना किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आयोजकांनी देखील सहमती दाखवत प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन दिले हाेते.

तगडा पोलिस बंदोबस्तकोणताही अनुचित प्रकार घडू नये व संरक्षण राहावे म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा व बंदोबस्त लावण्यात आला होता. यात छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकचे उपायुक्त नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत दोन सहायक पोलिस आयुक्त, सहा पोलिस निरीक्षक, अठरा पोलिस उपनिरीक्षक, १९० पोलिस कर्मचारी, ४० महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाचे २५ जवान, गुन्हे शाखेचे तसेच विशेष शाखेचे प्रत्येकी १० कर्मचारी, दामिनी पथक, दंगलविरोधी वज्र वाहन यासह इतरही काही वाहने, असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यावर दोन ठिकाणी तसेच किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ व भारत माता मंदिर येथे पोलिसांचा बंदोबस्त होता.

स्वराज्य प्रेरणा स्तंभ उभारणारदरम्यान, केंद्रीय पुरातत्त्व आणि राज्य शासन पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन किल्ला परिसरात स्वराज्य प्रेरणा स्तंभ परिसरात उभारण्यात येणार असल्याची माहिती संयोजक राहुल भोसले व विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतप्रमुख संजय बारगजे यांनी दिली.

खबरदारी म्हणून बंदोबस्तविशाळगड- गजापूर येथील घटना आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर एमआयएमतर्फे आयोजित निदर्शनाच्या वेळी झालेली गडबड या गोष्टी लक्षात घेऊन या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच समन्वय बैठक घेऊन आयोजकांशी आम्ही संवाद साधला होता. तेव्हाच आयोजकांनी सहकार्याचे आश्वासन दिले होते.- नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १.

स्वराज्य प्रेरणा दिन आताच कशासाठी?प्रश्न : स्वराज्य प्रेरणा दिन आयोजनाचा उद्देश काय?मनीष पाटील (संयोजक) : देवगिरी किल्ल्यावर २५ जुलै १६२९ विश्वासघाताने लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली; पण या घटनेचा विसर पडला आहे. हा खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी स्वराज्य प्रेरणा दिनाचे आयोजन केले होते. कोणताही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता.

प्रश्न : या दिनाचे आयोजन आताच का केले गेले?मनीष पाटील : लखुजीराजे जाधव यांच्याविषयी आजही लोकांना माहिती नाही. गाइडदेखील हा इतिहास सांगत नाही. त्यांच्याविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, हाच हेतू आहे. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून तयारी करीत होतो.

प्रश्न : देवगिरी किल्ल्यावर या दिनाचे नियोजन होते; परंतु तसे झाले नाही ?मनीष पाटील : देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार होता. मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने परवानगी नाकारली. त्यामुळे एका मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घ्यावा लागला.

प्रश्न : सरकारकडे काही मागणी केली आहे का?मनीष पाटील : पुढच्या वर्षी देवगिरी किल्ल्यावर हा स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्याचा प्रयत्न करू, तसेच देवगिरी किल्ल्यावर ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नाही तर ग्रामस्थांच्या माध्यमातून जागा मिळाली तर तेथे हा स्तंभ साकारू.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी