शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:47 IST

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: महाराष्ट्रात २ लाख बांगलादेशी नागरिकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,०६८ अर्ज झाले असून, सिल्लोड तालुक्यात एकट्या ४,७३५ अर्ज आले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. 

प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी न करता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, व बनावट रेशनकार्डच्या आधारे ४,७३५ अर्जदारांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. आश्चर्य म्हणजे, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. किरीट सोमय्या यांनी ही माहिती उघड करत एटीएसकडून चौकशी होणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या निर्वासितांची संख्या वाढत आहे. सिल्लोड व इतर भागांमध्ये त्यांना आश्रय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी सिल्लोड येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपजिल्हा दंडाधिकारी लतीफ पठाण आणि तहसीलदार संजय भोसले यांची भेट घेऊन त्यांनी काही फाईली तपासल्या. यामध्ये आवश्यक पुरावे आढळले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आकडेवारीचा धक्कादायक उलगडा२०१२-२२ दरम्यान फक्त १०२ लोकांनी न्यायालयाच्या माध्यमातून जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. मात्र, तहसीलदार आणि उपजिल्हा दंडाधिकाऱ्यांना अधिकार मिळाल्यानंतर २०२४ साली हा आकडा १,३३५ वर पोहोचला. तर २०२५ साली तो थेट ४,७३५ वर गेला आहे, असेही ते म्हणाले.

जन्म प्रमाणपत्रांची गरज का वाढली?काही नागरिकांनी सीएए आणि एनआरसीच्या भीतीने तसेच उमरा व हज यात्रेसाठी पासपोर्ट काढण्याच्या हेतूने जन्म प्रमाणपत्र घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याकडे टीसी, आधार, निवडणूक ओळखपत्र आणि रेशनकार्डसारख्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कठोर कारवाई करण्यात येईलसिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांनी सांगितले की, "आमच्या चौकशीदरम्यान अद्याप कुठलाही परदेशी नागरिक सिल्लोडमध्ये राहत असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, चौकशीत काही आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल."

५० वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्राची मागणी कशासाठी?ज्या नागरिकांचा जन्म ४०-५० वर्षांपूर्वी झाला आहे, त्यांनी सध्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. यामध्ये पालकांचा पुरावा नसणे आणि काही बनावट रेशनकार्डांच्या आधारे अर्ज केल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKirit Somaiyaकिरीट सोमय्याAbdul Sattarअब्दुल सत्तार