शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला

By स. सो. खंडाळकर | Updated: August 23, 2023 19:32 IST

एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला.

छत्रपती संभाजीनगर : व्हीजेएनटी प्रवर्गात बोगस जात प्रमाणपत्र काढून फायदा घेणाऱ्यांची व बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे दिलेले आश्वासन शिंदे-फडणवीस व अजित पवार सरकारने पूर्ण करावे व एसआयटी नेमावी या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी बंजारा, राजपूत भामटा, भटके विमुक्त समाज कृती समितीचा ‘पांढरे वादळ’ महामोर्चा आमखास मैदानावर धडकला. या महामोर्चाला बंजारा समाजाचा सहभाग लक्षणीय ठरला. पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिलांनी सहभाग नोंदवला. एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला.

दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. नेहमीचा मार्ग बदलून मोर्चा नूतन कॉलनी, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, खडकेश्वर, भडकलगेट मार्गे टाऊन हॉल उड्डाणपुलावरून आमखास मैदानावर आला. तेथे संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. ‘आज मची है चुहाशाही, ‘बोगस भामटे भाजप भाई भाई’, अशा घोषणा मोर्चात निनादत होत्या. अवघा मोर्चा सेवालालमय होता. गैरमार्गाचा वापर करून सवलती लाटणाऱ्या लोकांपुढे लोटांगण घालून एसआयटी नेमण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आदींवर करण्यात आला. नारायण कुचे, जयकुमार रावळ आदी आमदारांनी बंजारा समाजविरोधी भूमिका घेतल्याचा निषेधही नोंदवण्यात आला.

मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आमखास मैदानावरील सभेचे संचालन राजपालसिंग राठोड यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य राजेश राठोड, माजी खा. हरिभाऊ राठोड, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, आत्माराम जाधव, राजेंद्र साळुंके, डॉ. जगदीश राठोड, सुभाष राठोड, कांतीलाल राठोड, मोहन राठोड, दिगंबर राठोड, कैकाडी समाजाचे संजय मेडे, बुलढाण्याचे राजेश राठोड आदींनी जोरदार भाषणे केली. नंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले.

रोहिदास पवार, रमेश पवार, प्रमोद राठोड, राकेश पवार, प्रा. फुलसिंग जाधव, प्रा. बी. यू. राठोड, मुरहारी पवार, अरुण चव्हाण, विलास राठोड, नंदू पवार, प्रा. सुभाष राठोड, प्राचार्य ग. ह. राठोड, कला राठोड, अमरसिंग चव्हाण, दत्ताभाऊ राठोड, अनिल चव्हाण, वैजनाथ राठोड, जय राठोड व कृती समितीच्या सदस्यांनी मोर्चासाठी परिश्रम घेतले. सर्व चैतन्य महाराज, पोहरादेवीचे रमेश महाराज, भरत चैतन्य व विठ्ठल महाराज सभेच्या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMorchaमोर्चाreservationआरक्षण