शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:48 IST

जिल्हा उद्योग केंद्राची ४०, तर अण्णासाहेब महामंडळाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती

छत्रपती संभाजीनगर : सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने २५ टक्के आणि ३५ टक्के अनुदानात उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या सर्व योजनांना पतपुरवठा बँकांमार्फत केला जातो. मात्र, बँकांकडून बेरोजगारांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी, डीआयसीची उद्दिष्टपूर्ती होत नाही.

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना स्वत:चा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करण्यात येते. बँकेचे कर्ज घेऊन सलग तीन वर्षे उत्कृष्ट व्यवसाय केल्यानंतर कर्जदाराच्या बँक खात्यात त्यांच्या एकूण कर्जाच्या ३५ टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते. सीएमईजीपी योजनेतून कर्ज घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करतात.

या प्रकल्प अहवालाची तपासणी केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कर्जाची फाईल विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवितात. या फाईलच्या आधारे संबंधित अर्जदाराला व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्याची जबाबदारी बँकेची असते. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत १२०० बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्याचे उद्दिष्ट शासनाने उद्योग केंद्राला दिले आहे. मात्र, मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत केवळ ५२० बेरोजगारांनाच बँकांनी कर्ज दिले आहेत. आता दोन महिन्यांत बँकांकडून उद्दिष्टपूर्ती होईल, असे चित्र नाही.

अण्णासाहेब महामंडळाच्या अर्जदारांनाही बँकांचा ‘खो’अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगारांना १५ लाखांपर्यंत व्याज परतावा योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. यासोबत गट समूहांनाही मोठ्या कर्जाला व्याज परतावा दिला जातो. महामंडळाच्या या योजनांना बँकांकडून पतपुरवठा होतो. महामंडळाकडून अर्जदाराचे पात्रता पत्र बँकांना पाठविण्यात येते. यावर्षी महामंडळाला पाच हजार बेरोजगारांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजपर्यंत केवळ १ हजार ४०० जणांनाच बँकांनी कर्ज दिल्याची माहिती मिळाली. उर्वरित अडीच महिन्यांत ३६०० कर्जदारांना बँका कर्ज देण्याची शक्यताही नाही. परिणामी, महामंडळाचे उद्दिष्ट यंदाही पूर्ण होताना दिसत नाही.

टॅग्स :bankबँकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ