शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

By मुजीब देवणीकर | Published: May 09, 2024 1:07 PM

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह ‘अपना दवाखाना’मध्ये दहापैकी किमान चार रुग्णांना सौम्य उष्माघाताचा त्रास झाल्याचे निदर्शनास येत आहे. उलट्या, अतिसार, ताप, मळमळ, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी दिली जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

१ मेपासून सूर्य आग ओकत आहे. रविवार, दि.५ मेपासून तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत जात आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. डोक्याला, कानाला रुमाल बांधलेला नसेल, तर निश्चितच उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उष्णतेची लाट येण्यापूर्वीच मनपाच्या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. तापमानात वाढ होताच सकाळी आणि संध्याकाळी महापालिकेचे आरोग्य केंद्र, अपना दवाखान्यात किंचित उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली.

डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रांवर सौम्य उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर ओआरएस पाकिटांसह औषधीसाठाही देण्यात आला आहे. उन्हाचा किंचितही त्रास जाणवत असेल, तर रुग्णाने जवळच्या रुग्णालयात धाव घ्यायला हवी. वेळेवर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी डोके आणि कान रुमालाने झाकले पाहिजेत. दिवसभरात जास्तीत पाण्याचे सेवन करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. सर्व आरोग्य केंद्रांवर दिवसभरात १,१०० ते १,२०० रुग्ण येत आहेत. त्यातील काही रुग्णांना अत्यंत सौम्य उष्माघात असल्याचे निदर्शनास येत आहे.

तापमानातील चढ-उतार- ३ मे-----४०.४-४ मे -----४१.६-५ मे ------४१.६-६ मे ------४१.२-७ मे ------४०.८-८ मे ------४०.२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य