शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

विस्थापितांचे भक्तिनगर चिखलमुक्त झाले पण पाणीदार कधी होणार? 

By साहेबराव हिवराळे | Published: February 15, 2024 2:38 PM

एक दिवस एक वसाहत; डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी-कर्मचारी वास्तव्यास, पण तक्रार करण्यास पुढे येणार कोण?

छत्रपती संभाजीनगर : शहरात एक तपापूर्वी रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबविली गेली आणि त्यातून अनेक कुटुंबे विस्थापित झाली. या विस्थापितांनी मग पिसादेवी रोडवर भक्तिनगर वसवले. काळ्या शेतजमिनीत वसलेल्या भक्तिनगरवासीयांना तब्बल तपभर चिखल तुडवावा लागला. आता काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले असून जलवाहिनीही टाकण्यात आली. पण त्यातून पाण्याऐवजी फस्स हवा तेवढी येते. यातून नळाला पाणी कधी येणार याची प्रतीक्षा रहिवाशांना आहे. वीज पुरवठाही कमी दाबाने असल्याने घरातील वीज उपकरणे शोभेची बनली आहेत. 

भक्तिनगरात डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी- कर्मचारी वास्तव्यास आहेत. तरीही तक्रार करण्यास कुणीही पुढे धजावत नाही. त्यामुळे प्रश्न सुटणेही अवघड झाले आहे. यशवंतनगरातील तीन गल्ल्यांतील रस्ते अजूनही मातीचेच आहेत. त्यामुळे रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागणार आहेच. शेतजमिनीतील ही वसाहत असल्याने सर्वांनी बोअरवेलच घेतले. हे पाणी वापरासाठी आणि जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.

वसाहतीत कचरागाडी येते परंतु सफाई कर्मचारी फिरकत नाहीत. घंटागाड्यांतील कचरा वाहतूक करणाऱ्यांनी कचरा गोळा करून तो सुरळीत वसाहतीबाहेर नेऊन टाकावा जेणेकरून परिसरात अस्वच्छता पसरणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

सरपटणारे प्राणी आढळतात....सध्या रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे घरापर्यंत लहान मुलांंना आणि ज्येष्ठांना ये-जा करणे सोयीचे ठरते आहे. परंतु लगत परिसरात शेती आणि मोंढा असल्याने सरपटणारे प्राणी अनेकदा अंगणात दिसतात. अशा वेळी सर्पमित्रांना बोलवावे लागते. परंतु सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात आठवड्यातून एकदा तरी स्वच्छता करावी व औषध फवारणी करावी. -सुशीला गायकवाड

जलवाहिनी दिसते, पाणी नाही... यशवंतनगरात तीन रस्ते सिमेंट काँक्रिट विनाच सोडले आहेत. आम्ही स्वखर्चाने ड्रेनेज लाइन टाकली. आता नुकतीच जलवाहिनी टाकली आहे परंतु त्यास पाणीदेखील सोडण्यास आलेले नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना दरवर्षीप्रमाणे चिखल तुडवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यावर आणून सोडावे न्यावे लागते. किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.- अन्वर शहा

गुंठेवारीचा मोठा प्रश्नगुंठेवारीचा प्रश्न सुटलेला नसल्याने नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. कर वसुली केली जाते; पण मनपात असूनही खेड्यागत अवस्था आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांना सोडविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.-जिजाबाई जमधडे

शहरात जाण्याची गरज नाही...प्रत्येक बारीकसारीक वस्तूंसाठी पूर्वी शहरात जावे लागत होते; आता पिसादेवी रस्त्यावर हॉस्पिटल, हॉटेल, मंगल कार्यालये, दुकाने आहेत. त्यामुळे शहरात जाण्याची गरज नाही. भक्तिनगरात जलवाहिनी टाकावी, अशी मागणी आहे.-कैलास काकडे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका