शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

भीम आर्मीची अभिवादन रॅली अर्ध्यातच गुंडाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 03:12 IST

परराज्यातील कार्यकर्त्यांकडून दिशाभूल

औरंगाबाद : स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काढण्यात आलेली अभिवादन रॅली भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना रविवारी सकाळी अर्ध्यातूनच गुंडाळावी लागली.भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहरातील काही महापुरुषांच्या पुतळ्याला वाहन रॅलीद्वारे अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे सुभेदारी विश्रामगृहापासून येथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे जथे जमा झाले. सकाळी ११.३० वाजता सुभेदारी विश्रामगृहापासून रॅलीला सुरुवात होणार तोच उत्तर प्रदेश येथील काही कार्यकर्त्यांनी गुगल मॅपवरून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अंतर तपासले. पुतळा अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याचे त्या कार्यकर्त्यांनी आझाद यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकीऐवजी पायी चालत जाणे पसंत केले. सुभेदारी विश्रामगृहापासून भडकल गेटजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अंतर दोन-अडीच किलोमीटर आहे, असे भीम आर्मीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगण्याचा बराच प्रयत्न केला; पण चंद्रशेखर आझाद ऐकतील तेव्हा. त्यांनी कोणाचे काही एक ऐकून न घेता ते तडख हातात तिरंगा ध्वज व संविधानाची प्रत, गळ्यात निळे उपरणे टाकून पायी निघाले. कार्यकर्त्यांचा घोळकाही मग त्यांच्यासोबत पायीच चालत निघाला. चालत चालत ते पुतळ्याजवळ आले तोपर्यंत त्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पुष्पहार अर्पण करून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.पुढे मिलकॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, सिडको बसस्थानक चौकाजवळ वसंतराव नाईक, हडको टीव्ही सेंटर येथे संभाजी महाराज आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता केली जाणार होती. तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी पायी जाणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा आपली दिशाभूल झाली, असे चंद्रशेखर आझाद यांच्या लक्षात आले व त्यांनी ही रॅली भडकलगेट येथेच थांबविली व ते एका चारचाकी वाहनात बसून परत सुभेदारी विश्रामगृह येथे गेले. संतप्त चंद्रशेखर आझाद यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे गेल्यानंतर ते एका सूटमध्ये जाऊन बसले. बराच वेळ त्यांनी कार्यकर्ते तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटण्याचे टाळले. यावेळी मुंबई, मनमाड, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, बीड येथून बरेच कार्यकर्ते आले होते. त्यांचाही भ्रमनिराश झाला.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मी