शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

मोठी कारवाई! सुरक्षेचे नियम तोडणाऱ्या १९० उद्योजकांवर खटले

By बापू सोळुंके | Published: January 03, 2024 2:46 PM

औद्योगिक सुरक्षा विभागाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी घालून दिलेल्या सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील १९० उद्योजकांविरोधात औद्योगिक सुरक्षा विभागाने विविध न्यायालयांत खटले भरले आहेत.

वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्याेगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कारखाने अधिनयम १९४८ नुसार २२८९ कारखान्यांची आमच्या विभागाकडे नोंद आहे. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १३३६, जालन्यात २२८, परभणीत ५८, हिंगोलीत ३४, बीड २३८, नांदेड १९२, धाराशिव १०० आणि लातूरमध्ये १०३ कारखान्यांचा समावेश आहे. ज्या कारखान्यांची औद्याेगिक सुरक्षा विभागाकडे रीतसर नोंद आहे, त्या कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे कंपनीमालक आणि व्यवस्थापकास बंधनकारक आहे.

औद्योगिक सुरक्षा विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कारखान्यांची तपासणी केली, तेव्हा १९० कारखान्यात सुरक्षा नियमांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसून आले. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारखानदारांविरोधात न्यायालयात खटले भरण्यात आल्याची माहिती उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी दिली.

अनेक कारखाने करीत नाहीत फॅक्टरीची नाेंद२० पेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागाकडे नोंद करण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाची आहे. मात्र असे असूनही अनेक कंपन्यांकडून ही माहिती लपविली जाते. अशा कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकांमध्ये औद्योगिक सुरक्षा नियमांबाबत जागरुकता निर्माण करून त्यांची या विभागाकडे नोंदणी करून घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद