शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प

By यदू जोशी | Updated: July 31, 2024 11:23 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले.

मुंबई / छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठीचा हा करार असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले. चारचाकी मोटारींच्या उत्पादनात जगात अव्वल असलेल्या या कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, असे गुंतवणुकीसाठीचे तीन पर्याय होते. मात्र, अखेर त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पात पेट्रोल, डिझेल आणि हरित ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. विशेषत: सहा महिन्यांपासून या प्रकल्पाला गती आली. महाराष्ट्र सरकार आणि कंपनीमध्ये अनेक बैठका झाल्या. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान २० वेळा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली गेली. आता बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर करार होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा प्रामुख्याने उपस्थित असतील.

२४ हजार जणांना मिळणार रोजगारछत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी या उद्योगनगरीत एक हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पात ८ हजार जणांना प्रत्यक्ष तर १६ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. या शिवाय, या प्रकल्पाच्या निमित्ताने महत्त्वाच्या ॲन्सिलरिजची (सहायक कंपन्या) उभारणी होईल. २०२७च्या सुरुवातीला या प्रकल्पात पहिली मोटारगाडी तयार होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक या निमित्ताने होणार आहे.

मराठवाड्याचे अर्थकारण बदलेलविदर्भ आणि मराठवाड्याच्या गतिमान विकासासाठी आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी महाराष्ट्राप्रति नेहमीच सहकार्याची भावना बाळगली आहे. त्याचाच परिपाक म्हणून ‘टोयोटा’ची मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. मराठवाड्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे बदलेल.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीToyotaटोयोटाDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर