शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:01 IST

अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीतील कार्यक्रमात बागडेंच्या उपस्थितीत मारला टोला 

ठळक मुद्देराजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत होता. 

फुलंब्री : राज्यात युतीच्या सत्तेत  हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी सभागृहात मला बोलण्याची फार कमी संधी दिली. याउलट ते माझ्यापेक्षा एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची जास्त संधी देत होते. त्यामुळे भाजप आणि एमआयएमचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाही, असा टोला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात बागडे य यांना लगावला.  

खामगाव फाटा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार होते. यावेळी व्यासपीठावर हरिभाऊ बागडेही उपस्थित होते. अब्दुल सत्तार आपल्या खास शैलीत म्हणाले की, भाजप आणि एमआयएमचे संबंध काय आहेत, हे अजूनही बहुतांश लोकांना कळलेले नाहीत. त्यात मीसुद्धा आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जहरी टीका करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत           होता. बागडे यांच्यासंबंधीची तक्रार करताना अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या आमदारास त्यांच्याकडून सातत्याने प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला पणनचे संचालक शिवाजी दसपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार शीतल राजपूत, सहायक निबंधक विष्णू रोडगे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, शिवाजी पाथ्रीकर, प्रभाकर आदी उपस्थित होते. 

केंद्राकडून सूडाचे राजकारणखैरे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारला अनेक संघटना व उद्योजकांनी आर्थिक मदत केली. मात्र, केंद्राने राजकीय सूडापाेटी महाराष्ट्राला एका रुपयाचीही आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप केला.  

कृषी विधेयकाबाबत अफवा केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकरी आपला शेतीमाल कोठेही आणि कोणालाही सहज विक्री करू शकतो. मात्र, विरोधक अफवा पसरवून  शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. मागील वर्षी मका खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली; पण राज्याला खरेदीसाठी लागणारा बारदानाही उपलब्ध करता आला नसल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपा